अवघा राजपथ महाराष्ट्रमय! प्रजासत्ताकदिनी चित्ररथातून जैवविविधतेचे दर्शन

यंदाच्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर (Rajpath, Delhi) महाराष्ट्रातील जैवविविधतेवर आधारित चित्ररथाने (Chitrarath) सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.
Maharashtra Chitrarath
Maharashtra ChitrarathSakal

Republic day 2022: यंदाच्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर (Rajpath, Delhi) महाराष्ट्रातील जैवविविधतेवर आधारित चित्ररथाने (Chitrarath) सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. या चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जैवविविधतेचं (Biodiversity in Maharashtra) दर्शन संपूर्ण भारतवासीयांना घडून आले. काही दिवसांपुर्वी सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र सरकारने (Central Government) या चित्ररथाला परवानगी नाकारण्यात आली होती. परंतु पुन्हा केंद्राने आपला निर्णय बदलला आणि दिल्लीतील राजपथावरील संचलनात महाराष्ट्राच्या (Maharashtra) चित्ररथाला अखेर परवानगी मिळाली. त्यामुळे आजचा महाराष्ट्राच्या चित्ररथ अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरला.

Maharashtra Chitrarath
Republic Day 2022: दिल्लीताल संचलनात पुणे विद्यापीठातील चार विद्यार्थी

‘महाराष्ट्राची जैवविविधता’ या विषयावर आधारित या देखण्या चित्ररथाच्या अग्रभागी कास पठाराला स्थान देण्यात आलं होतं. युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा स्थळांच्या यादीत कास पठाराचा (Kass Plateau) समावेश असून येथे आढळणाऱ्या दुर्मिळ फुलांसोबतच ‘सुपरबा’ (Suparba) या दुर्मिळ सरड्याची प्रतिकृतीही साकारण्यात आली आहे. महाराष्ट्राचा राज्यप्राणी ‘शेकरू’च्या (Shekru) सुमारे 15 फुटांची आकर्षक प्रतिकृती सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. याशिवाय चित्ररथाच्या पुढच्या भागात महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू (butterfly) ‘ब्ल्यू मॉरमॉन’च्या (Blue Mormon) आठ फूट उंचीच्या देखण्या प्रतिकृतीने चित्ररथाची शोभा वाढवली. तसेच महाराष्ट्राचे राज्यफुल ‘ताम्हण’चे (Tamhan) सुमारे दीड फूटाचे गुच्छही ठेवण्यात आले आहेत. त्यावर छोटी छोटी फुलपाखरेही दाखवण्यात आली आहेत. चित्ररथावरील महाराष्ट्राचा राज्यपक्षी ‘हरियाल’च्या (Hariyal) प्रतिकृतीवर अनेकांच्या नजरा खिळून राहिल्या तसेच शेवटच्या टप्प्यातील सुमारे 15 फुटाचं आंब्याचे झाड (mango tree) विशेष आकर्षक दिसत होते.

Maharashtra Chitrarath
भारत प्रजासत्ताक झाला म्हणजे नेमकं काय झालं?

दरवर्षी भारताच्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारीला दिल्लीतील राजपथावर होणाऱ्या संचलनात देशातील विविध राज्याच्या संस्कृतीचे प्रतिक असणारे चित्ररथ सहभागी होत असतात. यामध्ये विविध राज्यांच्या चित्ररथांना प्रत्येकवर्षी ठराविक निकषांनुसार संधी दिली जाते. महाराष्ट्राच्या चित्ररथांनी २०१५ नंतर दोन वेळा सर्वोत्तम चित्ररथाचा किताब पटकवला आहे. २०१५ मध्ये 'पंढरीची वारी' या संकल्पनेवर आधारित चित्ररथ साकारला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com