
अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर कोसळले. विमानातील २४१ जणांचा मृत्यू झाला आहे. टेक ऑफ झाल्यानंतर काही वेळातच विमान कोसळले. या अपघातात फक्त एक जण बचावला आहे. पोलीस आयुक्तांनी याबाबत माहिती दिली. यानंतर अपघातातून वाचलेल्या व्यक्तीने माध्यमांना घटनेबद्दल सांगितलं आहे.