CDS Anil Chauhan
esakal
रांची (झारखंड) : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा (Pahalgam Terror Attack) बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने ७ मे २०२५ च्या मध्यरात्री पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर मोठा हल्ला केला. यावेळी ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor Strike) राबवण्यात आले. परंतु, हा हल्ला अगदी रात्री १:०० ते १:३० वाजता का करण्यात आला? याबाबत सीडीएस अनिल चौहान यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.