

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्राथमिक चौकशीत धक्कादायक खुलासे झाले आहेत. भारतीय लष्कर, जम्मू काश्मीर पोलीस आणि प्रशासनाच्या संयुक्त चौकशी समितीने मृतदेहांची अवस्था बघून गंभीर बाबी मांडल्या आहेत. तपास करणाऱ्यांना असं आढळून आलं की, २० मृतांची पँट खाली ओढलेली होती किंवा त्यांची चेन उघडली होती. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचं नाव, धर्म विचारून डोक्यात गोळी मारल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय.