पेगासस हा भारतीय लोकशाही चिरडण्याचा प्रयत्न होता - राहुल गांधी

"संसदेत आम्ही यावर चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करु. यावर चर्चा होऊ नये, अशीच भाजपाची इच्छा असेल"
Rahul Gandhi
Rahul GandhiTeam eSakal

नवी दिल्ली: पेगासस (Pegasus) पाळत प्रकरणी सुप्रीम कोर्टाने (supreme court) आज मोठा निर्णय घेतला. तीन सदस्यीय समिती स्थापन केली. "पेगाससच्या विषयात सर्वोच्च न्यायालयाने लक्ष घालण्याचा निर्णय घेतला, त्याबद्दल आम्ही आनंदी आहोत. संसेदत आम्ही पुन्हा हा मुद्दा उपस्थित करु. संसदेत आम्ही यावर चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करु. यावर चर्चा होऊ नये, अशीच भाजपाची (bjp) इच्छा असेल" असे काँग्रेस नेते राहुल गांधी (rahul gandhi) म्हणाले.

"पेगासस हा भारतीय लोकशाही चिरडण्याचा प्रयत्न होता. आम्ही या विषयात लक्ष घालू हे सर्वोच्च न्यायालयाकडून उचलण्यात आलेले मोठे पाऊल आहे. यातून सत्य समोर येईल असा मला विश्वास आहे" असे काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले.

Rahul Gandhi
मी तुझ्या घरातला TV फोडला होता? भज्जीनं घेतली अमीरची फिरकी

"शेवटच्या संसदीय अधिवेशनात आम्ही पेगाससचा मुद्दा उपस्थित केला होता. आज सर्वोच्च न्यायालयाने यावर आपलं मत मांडलं आणि आम्ही जे म्हणत होतो, त्याला पाठिंबा दिला. आमचे तीन प्रश्न होते. पेगाससला कोणी परवानगी दिली? कोणाविरोधात त्याचा वापर झाला आणि दुसऱ्या देशाकडे आपल्या लोकांची माहिती आहे का?" असे राहुल गांधी म्हणाले.

Rahul Gandhi
आणखी एका साक्षीदाराची पलटी, समीर वानखेडेंच्या अडचणी वाढल्या

"पेगाससचा मुख्यमंत्री, माजी पंतप्रधान आणि भाजपाच्या मंत्र्यांविरोधात वापर झाला. पेगाससच्या वापरातून मिळणारा डाटा पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडे जात होता? निवडणूक आयोगाची फोन टॅपिंग, विरोधी पक्षनेत्यांचा डाटा पंतप्रधानां मिळत होता? जर हे असं घडत असेल, तर हा गुन्हा आहे" असे राहुल गांधी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com