Piyush Goyalesakal
देश
'लोक वारंवार मतदान करून कंटाळतात, म्हणून वन नेशन वन इलेक्शन गरजेचे'; केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं महत्त्वाचं विधान
Piyush Goyal advocates for One Nation One Election : 'विविध राज्यांत वेगवेगळ्या काळात निवडणुका झाल्याने नागरिक आणि प्रशासन या दोघांवरही मोठा ताण येतो. सतत मतदानाला सामोरे जावे लागल्याने लोकांचा उत्साह कमी होतो.'
One Nation One Election : केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी ‘वन नेशन, वन इलेक्शन’ ही संकल्पना देशासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, 'लोक वारंवार मतदान करून थकलेले आणि कंटाळलेले दिसतात. निवडणुका एकत्र झाल्यास मतदारांचा सहभाग वाढेल, शासन अधिक परिणामकारक ठरेल आणि खर्चातही मोठी बचत होईल.'