PM मोदींनी भाषणात मांडली ब्ल्युप्रिंट पण जनतेला आठवत आहे जुनी आश्वासने

काही लोकांचे म्हणणे आहे की 2022 मध्ये दिलेल्या आश्वासनाची अंतिम मुदत आता 2047 झाली आहे का
narendra modi
narendra modiesakal

पंतप्रधान मोदी यांनी आज 75 व्या स्वतंत्र्य दिना निमीत्त देशाला संबोधीत केले. मोदी यांनी आज लाल किल्ल्यावरून देशाला संबोधीत करताना म्हणाले 2047 पर्यांत देशाला विकसीत देश बनवण्याची योजना आखली आहे. अशा स्थितीत त्यांची पूर्वीची आश्वासने पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत येऊ लागली. त्यामुळे घरे, शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि इतर प्रश्नांबाबत त्यांनी दिलेली आश्वासने लोकांना आठवली. काही लोकांचे म्हणणे आहे की 2022 मध्ये दिलेल्या आश्वासनाची अंतिम मुदत आता 2047 झाली आहे का.

जून 2018 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण च्या लाभार्थ्यांशी संवाद साधताना, पंतप्रधान म्हणाले होते की सरकार 2022 पर्यंत प्रत्येक भारतीयासाठी एक घर मिळण्यासाठी काम करत आहे. गृहनिर्माण योजना ही केवळ वीट-मोटारशी संबंधित नाही, ही योजना जीवनाच्या चांगल्या दर्जाविषयी आहे आणि स्वप्न खरी करण्यासाठी आहेत. भारताला स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होत असताना 2022 पर्यंत प्रत्येक भारतीयाकडे घर असावे यासाठी आम्ही काम करत आहोत.

यावर्षा मोदी यानी शेतकऱ्यां सोबत संवाद साधताना म्हणाले की होते की 2022 पर्यंत देशातील शेकऱ्यांच्या पीकाला दुप्पट भाव देणार आसल्याची घोषणा केला होती. उत्पन्न दुप्पट करण्याच्या आश्वासनाचा पुनरुच्चार करताना ते म्हणाले होते की, शेतीसाठी अर्थसंकल्पात तरतूद वाढविण्याबाबत चर्चा झाली होती. 2018 च्या तुलनेत 2022 मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न सरासरी 1.3-1.7 पटीने वाढले आहे, असा दावा अलीकडील SBI संशोधन अहवालात करण्यात आला आहे.

narendra modi
नितीश-तेजस्वी सरकार मध्ये मंत्रीपदांवर एकमत 16 ऑगस्टला घोषणा होण्याची शक्यता

पंतप्रधानांचे आश्वासन पूर्ण करत नसल्याने विरोधी पक्ष अनेकदा त्यांच्यावर टीका करतात . काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी अलीकडेच मोदी सरकारला 2022 पर्यंत प्रत्येक भारतीयाला घर, 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, 2022 पर्यंत बुलेट ट्रेन चालवणे आणि 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था - USD पर्यंत पोहोचेल अशा आश्वासनांची आठवण करून दिली. सारखी प्रमुख आश्वासने यावर गौरव वल्लभ यांनी विचारले की, "खोट्या आश्वासनांची ही संस्कृती कशी आणि कधी संपणार? पंतप्रधान 2022 सालासाठी आश्वासनांसाठी नवी वर्ष देणार आहेत का?"

2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्या शेवटच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान म्हणाले होते की 2022 पर्यंत भारत एक "मुलगा किंवा मुलगी" राष्ट्रध्वज घेऊन अवकाशात पाठवेल. 2018 मध्ये, तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी दावा केला होता की अहमदाबाद आणि मुंबई दरम्यान धावणाऱ्या भारतातील पहिल्या हाय-स्पीड बुलेट ट्रेनचे स्वप्न प्रत्यक्षात येण्याच्या जवळ आहे आणि या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे ऑपरेशन 2022 मध्ये सुरू होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com