नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींनी (PM Modi) आज पुन्हा काँग्रेसवर (Congress) हल्लाबोल केला. काँग्रेस नसती तर देशात काय घडलं असतं? असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. त्यावरून त्यांनी काँग्रेसच्या चुकांचा पाढा संसदेत वाचला. महात्मा गांधींना देखील माहिती होतं की काँग्रेस नसती तर काय झालं असतं? त्यांना देखील काँग्रेस नको होती, असं पंतप्रधान मोदी संसदेत म्हणाले. (PM Narendra Modi criticized Congress)
काँग्रेस नसती तर...
लोकशाही (Democracy) काही तुमची देण नाही. या घराणेशाहीपासून लोकशाहीला सर्वात मोठा धोका आहे. भारत म्हणजे इंदिरा या विचारधारेचा हा परिणाम आहे. काँग्रेस नसेल तर काय होईल, हे सर्वांना माहिती होतं. हे महात्मा गांधींना (Mahatma Gandhi) देखील माहिती होतं. त्यामुळे त्यांना काँग्रेस नको होती. महात्मा गांधींच्या इच्छेनुसार काँग्रेस नसती तर काय झाले असते? लोकशाही घराणेशाहीतून मुक्त झाली असती. भारत विदेशीऐवजी स्वदेशी संकल्पावर चालला असता. काँग्रेस नसती तर आणीबाणीचा कलंक लागला नसता. काँग्रेस नसता तर जातीयवाद आणि भ्रष्टाचार नसता. काँग्रेस जर नसती शिखांचं नरसंहार झाला नसता. वर्षानुवर्ष पंजाब दहशवादामध्ये धगधगत नसता. काँग्रेस नसती तर सामान्य माणसांना रस्ता, विजेसाठी वाट पाहावी लागली नसती, असा जोरदार हल्लाबोल मोदींनी काँग्रेसवर केला.
अमेरिका, ब्रिटेन कोरोनापासून त्रस्त आहे. १९ देशात जिथं युरो करन्सी आहे तिथे महागाई वाढलेली आहे. पण, आम्ही महामारीच्या काळात महागाई रोखण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत. या महागाईची तुलना युपीए सरकारसोबत केली तर समजेल की महागाई काय असते? त्यावेळी दुहेरी आकड्यात महागाई होती. आता भारत एकमेव अशी अर्थव्यवस्था आहे जिथं महागाई कमी आहे. इतर देशात अर्थव्यवस्थेची वाढ कमी झाली आहे, महागाई वाढलेली आहे, असं म्हणत तत्कालीन काँग्रेस सरकारवर मोदींनी टीका केली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.