नवी दिल्ली : दरवर्षीची परंपरा मोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा प्रजासत्ताकदिनी अमर जवान ज्योती ऐवजी नव्याने निर्मित राष्ट्रीय युद्ध स्मारकात (वॉर मेमोरियल) जाऊन हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहणार आहेत.
भारत-पाकिस्तान यांच्यातील 1971 च्या युद्धातील हुतात्मा जवानांच्या स्मरणार्थ अमर जवान ज्योतीची "इंडिया गेट'वर 1972 मध्ये स्थापना करण्यात आली होती. तिन्ही सेना दलांचे प्रमुख स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताकदिनी अमर जवान ज्योती येथे आदरांजली वाहतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 जानेवारीला सकाळी राजपथावरील संचलन सुरू होण्याआधी "वॉर मेमोरियल' येथे जाणार आहेत. तेथे ते तिन्ही सेनादलांच्या प्रमुखांच्या आणि सरसेनाध्यक्षांच्या उपस्थितीत हुतात्मा जवानांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहतील, अशी माहिती लष्करी सूत्रांनी दिली. या वेळी केवळ पंतप्रधान मोदीच राष्ट्रीय युद्ध स्मारकात पुष्पचक्र अर्पण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
म्हणून त्यांनी मुलाचे नावच ठेवले 'काँग्रेस'
राष्ट्रीय युद्ध स्मारकाची निर्मिती 40 एकर परिसरात करण्यात आली आहे. अमर, वीरता, त्याग आणि रक्षक अशा चार चक्रांनी ते बनले आहे. यात 25 हजार 342 जवानांची नावे ग्रेनाइटवर सुवर्णाक्षरांत कोरली आहेत.
सुभाषचंद्र बोस यांना भारतरत्न देण्याची मागणी
हे युद्ध स्मारक भारताने 1962मध्ये झालेले भारत-चीन युद्ध, तसेच भारत आणि पाकिस्तानदरम्यान झालेल्या 1947, 1965, 1971 व 1999च्या युद्धांसोबतच श्रीलंकेत पाठवण्यात आलेल्या शांती सेनेतील आणि संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेदरम्यान हुतात्मा झालेल्या सैनिकांना समर्पित केले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.