Prashant Kishore: '4 जून रोजी भरपूर पाणी सोबत ठेवा'; लोकसभेत भाजपच्या विजयाचा दावा करणाऱ्या प्रशांत किशोर यांचा टीकाकारांना सल्ला

Prashant Kishore: प्रशांत किशोर यांनी आज सोशल मिडीयावर पोस्ट करत 4 जून रोजी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देऊन आपल्या टीकाकारांवर हल्लाबोल केला आहे. 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत.
Prashant Kishore
Prashant KishoreEsakal

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी अलीकडच्या काळात दिलेल्या मुलाखतीत भाजपच्या 2019 च्या विजयाचा दावा केला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप जितक्या जागा जिंकेल तितक्याच जागा या निवडणुकीत भाजप जिंकेल असं त्यांनी म्हटलं आहे. याशिवाय पीएम मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यास त्यांच्या प्राधान्यक्रमाचा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधक त्यांच्यावर टीका करत आहेत.

दरम्यान प्रशांत किशोर यांनी आज त्यांच्या सोशल मिडीया अकाऊंटवरून एक पोस्ट करत, 4 जून रोजी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देऊन आपल्या टीकाकारांचा समाचार घेतला. 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत.

प्रशांत किशोर आपल्या पोस्टमध्ये लिहतात, "पाणी पिणे चांगले आहे कारण ते मन आणि शरीर दोन्ही हायड्रेट ठेवते. या निवडणुकीच्या निकालाचे माझे मूल्यांकन पाहून ज्यांना आश्चर्य वाटते त्यांनी 4 जून रोजी भरपूर पाणी सोबत ठेवावे. 2 मे 2021 आणि बंगाल यांना लक्षात ठेवा."

Prashant Kishore
Prashant Kishore: आवाज कमी करा... 'तो' प्रश्न विचारताच प्रशांत किशोर संतापले, व्हायरल व्हिडिओमध्ये पाहा नेमकं काय घडलं?

2021 मध्ये झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल आणि त्यापूर्वी त्यांनी केलेले भाकीत लक्षात ठेवण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वी प्रशांत किशोर म्हणाले होते की, बंगालमध्ये भाजप तिहेरी आकडा गाठणार नाही. त्याचवेळी अनेक वाहिन्यांनी भाजपच्या विजयाचे भाकीत केले होते. त्यानंतर प्रशांत किशोर यांच्या दाव्यानुसार निकाल आले होते.

Prashant Kishore
High Court News: मुलगा चांगल्या कुटुंबातील, मुलीचा विनयभंग करणाऱ्याला उच्च न्यायालयाने केला 'या' एका अटीवर जामीन मंजूर

प्रशांत किशोर नुकतेच एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, "मला वाटते मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप पुनरागमन करत आहे. त्यांना गेल्या निवडणुकीत जितक्या जागा मिळाल्या तितक्याच जागा यावेळी देखील मिळू शकतात किंवा त्यांची कामगिरी पूर्वीपेक्षा थोडी चांगली असू शकते. पीके म्हणाले की, भाजप सरकारच्या विरोधात लोकांची निराशा किंवा राग असला तरी मोदी सरकार हटवण्याबाबत फारसा राग दिसून येत नाही."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com