- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- कोरोना
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- अर्थसंकल्प
- आणखी..
- धन की बात
- अर्थसंकल्प
- जॉब नौकरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- सप्तरंग
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- राशी भविष्य
- संपादकीय
- सायन्स टेकनॉलॉजि
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- एज्युकेशन जॉब्स
- श्री गणेशा २०२०

त्यांचं हे आजवरचं 74 वं संबोधन असेल.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या 'मन की बात' या रेडीओ कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातील जनतेशी संवाद साधतील. त्यांचं हे आजवरचं 74 वं संबोधन असेल. या मनोगतात ते कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत तसेच लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याबाबत देशवासीयांशी संवाद साधण्याची शक्यता आहे.
याआधी गेल्या 73 व्या 'मन की बात'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने काढलेल्या ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसेचा ओझरता उल्लेख करत या विषयावर देशाचं लक्ष केंद्रीत केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की 26 जानवारी रोजी झालेल्या तिरंग्याच्या अपमानामुळे देश दुखी झाला आहे.
हेही वाचा - आसाममध्ये भाजपला मोठा झटका; प्रमुख सहकारी 'बोडोलँड पीपल्स फ्रंट'ने सोडली साथ
मोदींनी मागच्या मन की बातमध्ये कोरोना महासाथीबाबत चर्चा केली होती. त्यांनी म्हटलं होतं की या वर्षाच्या सुरवातीसह कोरोनाच्या लढाईला देखील आता जवळजवळ एक वर्ष पूर्ण झालं आहे. भारताची कोरोना विरोधातील लढाई जगासमोर एक आदर्श बनून उभी राहिली आहे अगदी तसेच आता कोरोना लसीकरणाच्या मोहिमेने देखील जगाला भूरळ पाडली असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. आजच्या मन की बातमध्ये ते कोरोना व्यतिरिक्त आणखी कोणत्या बाबतीत संवाद साधतील, याकडे देशाचं लक्ष आहे. आज सकाळी 11 वाजता त्यांचं हे संबोधन देशासमोर सादर होईल.
