
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. निवडणूक आयोगाच्याच संकेतस्थळावरून डेटा घेत त्यात असलेल्या त्रुटी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेतून मांडल्या. यानंतर इंडिया आघाडीने निवडणूक आयोगावर मोर्चाही काढला. मतदार यादीत घोटाळा आणि मतदार यादीच्या पडताळणीवरून पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर राहुल गांधी यांनी हल्लाबोल केलाय.