वर्षभरातच दगावते ३६ पैकी एक अर्भक; ‘रजिस्ट्रार जनरल’ची माहिती

‘रजिस्ट्रार जनरल’ची माहिती, ग्रामीण, शहरी भागातील स्थिती
Registrar General Of India information One in 36 infants dies during the year health department
Registrar General Of India information One in 36 infants dies during the year health departmentsakal

नवी दिल्ली : मागील काही दशकांमध्ये देशभरातील अर्भकांचा मृत्यूदर कमी झाला असला तरीसुद्धा जन्मानंतर पहिल्या वर्षामध्येच ३६ पैकी एक अर्भक दगावत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. साधारणपणे अर्भकांचा मृत्यूदर संबंधित प्रदेश आणि देशातील आरोग्याचे निदर्शक मानले जाते. ‘रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया’कडून नवा डेटा प्रसिद्ध करण्यात आला असून त्यातून ही बाब उघड झाली आहे.

२०२० मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार दर एक हजार बालकांच्या जन्मामागे २८ अर्भकांचा मृत्यू झाला होता याच प्रमाणाची तुलना १९७१ मधील आकडेवारीशी केली तर आपल्याला हे प्रमाण एक चतुर्थांशापेक्षाही कमी असल्याचे दिसून येते. त्यावेळी दर हजार अर्भकांमागे १२९ अर्भके दगावत होती. मागील दहा वर्षांच्या काळामध्ये ही अर्भके मरण पावण्याचे प्रमाण ३६ टक्क्यांनी कमी झाल्याचे आढळून आले आहे. अखिल भारतीय पातळीवरील आकडेवारीचा विचार केला तर हेच प्रमाण मागील दशकभरामध्ये ४४ वरून २८ टक्क्यांवर गेले आहे. ग्रामीण भागामध्ये अर्भके दगावण्याचे प्रमाण हे ४८ वरून ३१ टक्के झाल्याचे दिसून आले आहे शहरी भागामध्ये ते २९ वरून १९ टक्क्यांवर आले आहे. वरकरणी मृत्यूदर हा काहीसा कमी झाल्याचे दिसून आले असले तरीसुद्धा (ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांमध्ये) एका वर्षाच्या अवधीमध्ये ३६ पैकी एक अर्भक दगावत असल्याचे दिसून आले आहे. केवळ २०२० या सालाचा विचार केला तर मध्यप्रदेश (४३ टक्के) आणि मिझोराममध्ये (३ टक्के) अर्भकांच्या कमाल मृत्यूदराची नोंद झाली आहे.

जन्मदरामध्ये घसरण

मागील पाच दशकांमध्ये राष्ट्रीय पातळीवरील जन्मदरामध्ये विक्रमी घट झाली असून तो १९७१ साली ३६.९ टक्के एवढा होता तो २०२० मध्ये १९.५ टक्क्यांवर आला. या काळामध्ये ग्रामीण आणि शहरी भागांतील फरक देखील वाढल्याचे दिसून आले आहे. ग्रामीण भागापेक्षाही शहरी भागामध्ये जन्मदर अधिक असल्याचे दिसून आले आहे. मागील दशकभराच्या अवधीमध्ये जन्मदर अकरा टक्क्यांनी घटल्याचे दिसून आले आहे. तो २०११ मध्ये २१.८ टक्के एवढा होता तो २०२० मध्ये १९.५ टक्क्यांवर गेल्याचे दिसून आले. ग्रामीण भागामध्ये हेच प्रमाण २३.३ टक्क्यांवरून २१.१ टक्क्यावर आल्याचे दिसून आले आहे तर शहरी भागामध्ये ते १७.६ टक्क्यांवरून १६.१ टक्क्यांवर गेले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com