कोलकता : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी पश्चिम बंगालमध्ये २० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. ही गुंतवणूक पुढील तीन वर्षांत केली जाणार आहे. कोलकता येथे सुरू असलेल्या सातव्या बंगाल ग्लोबल बिझनेस समिटमध्ये मुकेश अंबानी म्हणाले, की “रिलायन्सने बंगालमध्ये आतापर्यंत सुमारे ४५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. आम्ही पुढील तीन वर्षांत २० हजार कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक करणार आहोत.
ही गुंतवणूक टेलिकॉम, रिटेल आणि बायो एनर्जी क्षेत्रात केली जाणार आहे. फाइव्ह-जी राज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात नेत आहोत, विशेषत: ग्रामीण बंगालला जोडले जात आहे. आम्ही बंगालचा बहुतांश भाग व्यापला आहे. जिओ च्या नेटवर्कमध्ये राज्यातील ९८.८ टक्के लोकसंख्या व कोलकता टेलिकॉम सर्कलमधील १०० टक्के लोकसंख्या समाविष्ट आहे. जिओचे मजबूत नेटवर्क पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगारासह शिक्षण, आरोग्यसेवा आणि शेतीला चालना देईल.’’
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.