राम मंदिर उभारणी हेच भारताचं खरं स्वातंत्र्य, सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान

RSS Chief Mohan Bhagwat On Ram Mandir : आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी राम मंदिर उभारणी आणि प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा हेच भारताचं खरं स्वातंत्र्य असल्याचं म्हटलंय.
RSS Chief Mohan Bhagwat
RSS Chief Mohan Bhagwatesakal
Updated on

राम मंदिरात प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा भारताचं खरं स्वातंत्र्य असल्याचं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सोमवारी इंदौरमध्ये एका कार्यक्रमात व्यक्त केलं. प्रभू रामांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा दिवस हा प्रतिष्ठा द्वादशी म्हणून साजरा करायला हवा. हे अनेक शतकांच्या परकीय आक्रमणानंतर भारताच्या स्वायत्ततेच्या स्थापनेचं प्रतीक आहे असंही मोहन भागवत म्हणाले. गेल्या वर्षी २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिरात प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली होती. तिथीनुसार २०२५ मध्ये हा दिवस ११ जानेवारीला होता.

RSS Chief Mohan Bhagwat
Maha Kumbh 2025 Prayagraj: प्रयागराजमध्ये आजपासून महाकुंभ मेळ्याला सुरूवात; जाणून घ्या शाही स्नानाच्या तारखा
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com