Russia Ukraine War l 4000 हून अधिक भारतीय युक्रेनमधून मायदेशी परत

भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु
Meenakshi Lekhi
Meenakshi LekhiEsakal

रशियाने (Russia) केलेल्या हल्ल्यानंतर युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ निर्माण झाला आहे. दोन्ही देशामधील संघर्षात अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. अद्याप भारताचे (India) हजारो नागरिक अडकले आहेत. युक्रेनमध्ये आजमितीस १८ हजार भारतीय विद्यार्थी आहेत. रशियात त्यांची संख्या १४ हजार आहे. या दोनच देशांतील वैद्यकीय विद्यार्थ्यांची संख्या ३२ हजार आहे. आतापर्यंत ४००० हून अधिक लोक भारतात परत आल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी (Meenakshi Lekhi) यांनी आज दिली.

Summary

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु आहेत.

युक्रेनमध्ये (Ukraine) अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी वेगाने हालचाली केल्या जात असून भारतीयांना रोमानियातून एअर इंडियाच्या (Air India) विमानाने आणलं जात आहे.

Meenakshi Lekhi
'मराठा समाजाला न्याय देणे ही जबाबदारी राज्य सरकारची'; पाहा व्हिडिओ

रशियाने हल्ला केल्यानंतर युक्रेनने हवाई क्षेत्र बंद केलं आहे. त्याआधी एअर इंडियाने २२ फेब्रुवारीला युक्रेनची राजधानी किवला एक विमान पाठवलं होतं. त्यातून २४० जणांना भारतात परत आणण्यात आलं होतं. त्यानंतर २४ आणि २६ फेब्रुवारीला दोन आणखी विमाने जाणार होती, मात्र २४ तारखेलाच रशियाकडून हल्ला सुरु झाला. त्यानंतर युक्रेनने हवाई क्षेत्र बंद कऱण्यात आल्याची घोषणा केली. एअर इंडियाने ट्विटरवरून हि माहिती दिली.

दरम्यान, आज ४००० हून अधिक नागरीक भारतता परत आले आहेत. युक्रेनने हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे पर्यायी मार्गाचा वापर करण्यात येत असल्याचे ही परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com