हताशपणाचं गांभीर्य लक्षात घ्या, युक्रेनमध्ये भारतीय ठार झाल्यानंतर पवारांचं केंद्राला आवाहन

दिवसेंदिवस तणाव वाढत असल्याने युक्रेनमधील भारतीयांना अडचणींना सामोरे जावं लागत आहे.
sharad pawar
sharad pawaresakal

युक्रेन आणि रशियाचा तणाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. युक्रेनमध्ये सध्या भारताचे हजारो नागरिक आणि विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना भारतात आणण्याचं काम भारताकडून चालू आहे. युक्रेनमध्ये रशियन सैनिकांनी हल्ले करून महत्त्वाच्या शहरांना घेराव घातल्यामुळे भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी आव्हानं निर्माण होत आहेत. दिवसेंदिवस तणाव वाढत असल्याने तेथील भारतीयांना अडचणींना सामोरे जावं लागत आहे.

दरम्यान आज सकाळी रशियाच्या बॉम्ब हल्ल्यात भारतातील एक विद्यार्थी ठार झाला आहे. तो कर्नाटक राज्यातील होता. युक्रेनमधील भारतीय सीमेकडे जात असताना रशियन सैनिकांकडून त्यांना मारहाण करण्यात आली होती. भारताकडून युक्रेनमधील नागरिकांना आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत.

त्यासाठी भारताने 'ऑपरेशन गंगा' नावाची मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेद्वारे भारतातून विमाने पाठवून नागरिकांना परत आणण्यात येत आहे. सध्या या मोहीमेअंतर्गत बऱ्याच भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थांना मायदेशात आणण्यात आलं आहे. अजूनही काही भारतीय अडकलेले आहेत.

दरम्यान राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना आवाहन केलं आहे. शरद पवार यांना ट्वीट करत म्हटलंय की, "मी केंद्र सरकार आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना विनंती करतो की, त्यांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घ्यावं. तसंच विद्यार्थी, त्यांचे कुटुंबीय यांची दुर्दशा आणि हताशपणाचं गांभीर्य लक्षात घ्या." असं अवाहन त्यांनी ट्वीट केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com