
कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात कायद्याचा गैरवापर रोखण्यासाठी आता सुप्रीम कोर्टानं मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय दंड संहिता कलम ४९८ अ अंतर्गत कौंटुबिक हिंसाचाराच्या प्रकरणात शिक्षा दिली जाते. मात्र आता याचा गैरवापर रोखण्यासाठी २ महिने आरोपींना अटक करू नये असं सुप्रीम कोर्टाने निकालात म्हटलंय. याशिवाय कौटुंबिक कल्याण समिती स्थापन करण्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवलाय. तसंच मार्गदर्शक तत्वांनाही मान्यता देण्यात आलीय.