पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर काँग्रेस नेतृत्वात बदलाची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. काँग्रेसचे खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी पक्षाचे पुनरुज्जीवन करण्याबाबत बोलले आहे. त्यांनी काँग्रेसला सर्वांत विश्वासार्ह विरोधी पक्ष असल्याचेही सांगितले. थरूर यांनी यापूर्वीही पक्षात बदल आणि सुधारणांची मागणी केली आहे. (Congress is a credible opposition party)
काँग्रेस (Congress) सर्वांत विश्वासार्ह राष्ट्रीय विरोधी पक्ष आहे. म्हणूनच सुधारणा आणि पुनरुज्जीवन आवश्यक आहे, असे ट्विट देशातील विविध पक्षांच्या आमदारांच्या संख्येचा चार्ट शेअर करताना शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी केले. काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सुरू असताना थरूर यांनी हे वक्तव्य केले. बैठकीत पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
शशी थरूर (Shashi Tharoor) हे काँग्रेसच्या G-२३ नेत्यांपैकी एक आहेत. याशिवाय गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल, मनीष तिवारी यांच्यासह एकूण २३ नेत्यांचा यात समावेश आहे. ऑगस्ट २०२० मध्ये २३ काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून सक्रिय नेतृत्व आणि संघटनेत सर्वसमावेशक बदलांची मागणी केली होती. तेव्हापासून हे नेते चर्चेत राहतात आणि जेव्हा-जेव्हा पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागते तेव्हा हे नेते मागणी वारंवार करीत राहतात.
दारूण पराभवावर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक
पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा (Congress) दारूण पराभव झाला आहे. पंजाबमध्येही सत्ता गेली आहे. याशिवाय उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये पक्षाची कामगिरी पुन्हा एकदा निराशाजनक झाली आहे. निवडणुकीतील दारूण पराभवावर विचारमंथन करण्यासाठी रविवारी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पार पडली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.