...तेव्हा सोनिया गांधींनी पंतप्रधान व्हायला हवं होतं - आठवले

विदेशी वंशाचा मुद्दा निरर्थक होता.
Sonia Gandhi_Ramdas Athawale
Sonia Gandhi_Ramdas Athawale

नवी दिल्ली : केंद्रात २००४ साली संयुक्त पुरोगामी आघाडीचं (युपीए) सरकार सत्तेत आलं होतं. तेव्हा विदेशी वंशाच्या मुद्द्यांवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पंतप्रधानपदासाठी विरोध झाला होता. हा मुद्दा तत्कालिन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपस्थित केला होता. पण हा मुद्दा निरर्थक होता, त्यावेळी सोनिया गांधी यांनी पंतप्रधान व्हायला हवं होतं, असं परखड मत केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे.

आठवले म्हणाले, युपीए सत्तेत आल्यानंतर सोनिया गांधी यांनी पंतप्रधान व्हायला हवं होतं. जर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस अमेरिकेच्या उपाध्यक्ष होऊ शकतात तर सोनिया गांधी पंतप्रधान का होऊ शकत नाहीत? असा सवालही त्यांनी केला आहे. सोनिया गांधी या भारतीय नागरिक होत्या. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पत्नी तसेच लोकसभेच्या सदस्यही होत्या.

विदेशी वंशाच्या मुद्द्यावरुन शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले

सोनिया गांधी यांचा विदेशी वंशाचा मुद्दा उपस्थित करुन शरद पवार यांनी बंड केले होते. त्यानंतर सन १९९९ मध्ये ते काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. पुढे त्यांनी कायमच केंद्रात आणि राज्यात काँग्रेससोबत युती करत सत्तेत सहभागी झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com