
देशात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम आणायला लावून फेरमतमोजणी केली. यात चक्क निकालच बदलल्याचं समोर आलंय. हरियाणातील एका ग्रामपंचायतीच्या निकालाला आव्हान देण्यात आलं होतं. २ नोव्हेंबर २०२२ रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला होता. त्यात कुलदीप सिंगला विजयी घोषित केलं होतं. याला मोहित कुमार यांनी आव्हान देत याचिका दाखल केली होती.