

Supreme Court
esakal
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान देणाऱ्या आणि आझाद हिंद फौजेची स्थापना करणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांना राष्ट्रपुत्र घोषित करावे अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यालाही फटकारले आहे. फक्त प्रसिद्धी मिळवण्याच्या उद्देशाने अशा प्रकारच्या याचिका पुन्हा पुन्हा दाखल केल्या जात असल्याबद्दल न्यायालयाने तीव्र संताप व्यक्त केला.