खाल्ल्या मिठाला जागा! सुप्रिया सुळेंनी संसदेत सुजय विखेंची घेतली शाळा

supriya sule and sujay vikhe
supriya sule and sujay vikhe
Summary

महाविकास आघाडी सरकारचे नेते केंद्राने दिलेल्या निधीबद्दल आभार मानत नाहीत अशी टीका खासदार सुजय विखे पाटील यांनी केली होती.

नवी दिल्ली - लोकसभेत राष्ट्रवादीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपचे खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांची शाळा घेतल्याचं गुरुवारी दिसून आलं. सुजय विखे पाटील यांनी केंद्रातील युपीए सरकारच्या कारभारावर आणि राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर टीकास्र सोडले होते. याला सुप्रिया सुळे यांनी उत्तर देताना खाल्ल्या मिठाला जागावं असा टोला लगावला आहे. सुप्रिया सुळे यांनी सुजय विखे पाटील यांना युपीएमध्ये त्यांचे वडीलसुद्धा होते याची आठवण करून दिली.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी आठवण करून देते की, युपीएच्या दोन्ही कार्यकाळात त्यांचे वडील मंत्री होते. तेव्हा जी काही धोरणं मांडली गेली तेव्हा ते काँग्रेसमध्ये होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या वडिलांविरोधात टीका केलीय. आमच्या संस्कृतीत हे बसत नाही. मराठीत यासाठी एक म्हणही आहे, खाल्ल्या मिठाला जागावं, आम्ही आयुष्यभर हे लक्षात ठेवण्याची शिकवण मला आईने दिली असल्याचंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

महाविकास आघाडीवर सुजय विखे पाटील यांनी टीका केली. पंतप्रधानांनी दिलेल्या निधीतून विकास केला, पण महाविकास आघाडीच्या खासदारांनी त्याबदद्ल आभार मानलं नाही. सेवा एकाने करायची आणि मेवा दुसराच खातोय असा टोलाही सुजय विखे पाटील यांनी लगावला. केंद्राच्या निधीतून विकासकामे केली जातात, उद्घाटने करतात पण त्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानत नसल्याचं विखे पाटील यांनी संसदेत बोलताना म्हटलं होतं.

supriya sule and sujay vikhe
तो माझा अधिकार! लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधींना झापलं

खासदार सुजय विखे पाटील यांनी युपीए सरकारच्या दोन्ही कार्यकाळातील कारभारावर जोरदार टीका केली होती. आपण स्वत: सहकार क्षेत्रातून आलो असल्याचं सांगताना ते म्हणाले की, स्टार्ट अप इंडिया, आत्मनिर्भर भारत, शेतकऱ्यांचे बळकटीकरण याची सुरुवात सहकारातून झाली आहे. आशियातील पहिला साखर कारखाना सुरु करून विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकार चळवळीला चालना दिली असंही विखे पाटील यांनी संसदेत सांगितलं.

युपीए सरकारच्या काळात महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना कर्ज काढून एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना द्यावी लागली. कर्ज घ्या आणि एफआरपी द्या अशा पद्धतीने काम सुरु होते. महाराष्ट्रातील सर्व साखर कारखाने बंद केले. तेच बंद पडलेले साखर कारखाने आज महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी कमी किंमतीत खरेदी करून मालक बनल्याची टीका सुजय विखे पाटील यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com