टाटाने बोली जिंकली, ५३ वर्षानंतर एअर इंडियाची घरवापसी

Air India-TaTa group
Air India-TaTa groupsakal
Summary

1932 मध्ये टाटा ग्रुपने एअरलाइन्सच्या नावाने एअर इंडियाची सुरुवात केली होती.

नवी दिल्ली : उद्योग क्षेत्रातील देशातील विश्वसनीय टाटा समुहाने (TATA group) संकटात असलेली सरकारी विमान कंपनी एअर इंडिया (AIR India) खरेदी करण्यासाठी बोली लावली होती. आता ही बोली टाटा कंपनीने जिंकली आहे. त्यामुळे आता एअर इंडियाची ५३ वर्षानंतर लवकरच घरवापसी होणार आहे.

1932 मध्ये टाटा ग्रुपने एअरलाइन्सच्या नावाने एअर इंडियाची सुरुवात केली होती. टाटा एअरवेज या भारतातल्या पहिल्या हवाई वाहतूक करणाऱ्या कंपनीचं स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीयीकरण झालं आणि एअर इंडिया असं त्याच नामांतरण झालं. सध्याच्या घडीला एअर इंडिया कर्जबाजारी झाली असून या कंपनीचे खासगीकरण करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. तसं मोदी सरकारने 2018 मध्येच एअर इंडिया कंपनीच्या खासगीकरणाचा प्रयत्न सुरू केला होता. पण त्यावेळी कंपनी खरेदी करण्यासाठी कोणतीच उत्सुकता दाखवली नाही. आता अनेक कंपन्या एअर इंडिया खरेदीसाठी सकारात्मक असल्याचे चित्र आहे.त्यासाठी टाटा कंपनीने देखील बोली लावली होती. आज टाटाने बोली जिंकली असून तब्बल ५३ वर्षानंतर एअर इंडियाची टाटाकडे लवकरच घरवापसी होणार आहे.

विमान उद्योगात झेप घेण्यासाठी मोठी संधी - रतन टाटा

एअर इंडियाची मालकी पुन्हा एकदा टाटा ग्रुपकडे आल्यामुळे आनंद झाला आहे. एअर इंडियाच्या स्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी आम्ही मेहनत घेऊ. तसेच विमान उद्योगामध्ये मोठी झेप घेण्यासाठी ही चांगली संधी असल्याचे रतन टाटा म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com