

जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं पर्यटकांवर मोठा दहशतवादी हल्ला झालाय. या हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर देशाचे गृहमंत्री अमित शहा हे श्रीनगरला रवाना झाले असल्याचं सांगण्यात येत आहे. हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियातून गृहमंत्री अमित शहांशी फोनवर चर्चा केली. दहशतवादी हल्ल्यानंतर अधिकाऱ्यांसोबत बैठकही घेतली. अमित शहा यांनी घटनास्थळी जाण्याचे निर्देश मोदींनी दिले आहेत.