नवी दिल्ली - दहशतवाद (Terrorism) आणि कट्टरतेचा जागतिक शांततेला धोका (Danger) असून दहशतवादाला पाठीशी घालणाऱ्यांविरुद्ध आणि आर्थिक पाठिंबा देणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई (Crime) करावी, असे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथसिंह (Rajnath Singh) यांनी पाकिस्तानचे नाव न घेता आसियान देशांच्या व्यासपीठावर केले. (Terrorism Threatens the World Rajnath Singh)
आग्नेय आशियातील देशांची संघटना असलेल्या आसियानच्या संरक्षण मंत्र्यांच्या "एडीएमएम प्लस" या व्हर्च्युअल बैठकीत राजनाथ यांनी या संकटाचा मुकाबला करण्यासाठी सामुहिक दृष्टिकोनाची गरजही व्यक्त केली.
"एडीएमएम प्लस" हे आसियानचे दहा देश आणि सहकारी भारत, चीन, ऑस्ट्रेलिया, जपान, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया, रशिया आणि अमेरिकेचे व्यासपीठ आहे. या व्यासपीठावर संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी भारत प्रशांत क्षेत्राची अखंडता, सार्वभौमत्व जपण्याचे तसेच संवादातून वादाचे मुद्दे सोडविण्याचे आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन करून हे क्षेत्र मुक्त समावेशक ठेवण्याचेही आवाहन केले. तसेच पाकिस्तानचे नाव न घेता दहशतवादाचा जगाला असलेला धोकाही अधोरेखित केला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.