जम्मू : लष्कर-ए-इस्लाम या दहशतवादी संघटनेने जम्मू-काश्मीरमधील पुलवामा (Pulwama Jammu Kashmir) जिल्ह्यातील हवाल ट्रान्झिट निवासस्थानात राहणाऱ्या काश्मिरी पंडितांना (Kashmir Pandit) धमकी दिली आहे. स्थलांतरीत कॉलनीच्या अध्यक्षांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात, सर्व स्थलांतरीत आणि आरएएसचे एजंट्स यांनी काश्मीर सोडावे किंवा मृत्यूला सामोरे जावे, अशी धमकी देण्यात आली आहे.
काश्मिरी मुस्लिमांना मारण्यासाठी आलेल्या काश्मिरी पंडितांना काश्मीरमध्ये आणखी एक इस्त्रायल हवा आहे. पण, या काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांसाठी जागा नाही. तुमची सुरक्षा दुप्पट किंवा तिप्पट करा. पण, हल्ल्यासाठी तयार राहा. तुम्ही मरणार आहात, अशी धमकी पत्रातून दिली आहे.
जम्मू आणि काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात सरकारी कर्मचारी असलेले काश्मिरी पंडित राहुल भट यांची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली होती. गुरुवारी दुपारी मध्य काश्मीरमधील चदूरा येथील तहसीलदार कार्यालयात त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. 'काश्मीर टायगर्स' या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे काश्मिरी पंडितांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
हल्ल्यानंतर, काश्मिरी पंडित समाज रस्त्यावर उतरला असून निदर्शने करत आहे. काश्मिरी पंडित समुदायातील सरकारी कर्मचाऱ्यांनी शनिवारी जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांना पत्र लिहून काश्मीर खोऱ्यातून बाहेर काढण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी नोकरीचे राजीनामे देखील दिले आहेत. काश्मीर आमच्यासाठी सुरक्षित नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.