Mamata Banerjee
esakal
पश्चिम बंगालच्या राजकारणात सध्या मोठा गोंधळ सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर तृणमूल काँग्रेस (टीएमसी) पक्ष आता सर्वांत गंभीर आंतरिक संकटाचा सामना करत आहे. पक्षांतर्गत असंतोष, बंडखोर नेत्यांची कारवाया आणि काही आमदारांच्या गुप्त बैठका यामुळे महाराष्ट्रातील राजकीय घटनांची पुनरावृत्ती बंगालमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.