

पुणे: मुंबई- बंगळूर महामार्गावर कात्रज नवीन बोगद्यापासून काही अंतरावरील स्वामी नारायण मंदिर ते नवले पुलादरम्यान मागील तीन वर्षांत गंभीर आणि किरकोळ अशा एकूण २७ अपघाताच्या घटना घडल्या. या अपघातांमध्ये २७ जणांचा बळी गेला आहे. तर ३७ जण जखमी झाले आहेत. ही माहिती शहर वाहतूक शाखेकडून देण्यात आली.