"उद्धव ठाकरेंनी गमावला सरकार चालवण्याचा नैतिक अधिकार"

Uddhav Thackarey
Uddhav Thackarey

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला. देशमुख यांच्या राजीनाम्यावरुन भाजपाने राष्ट्रीय पातळीवर महाविकास आघाडी सरकारला टार्गेट केलं. उद्धव ठाकरे यांनी सरकार चालवण्याचा नैतिक आधार गमावला आहे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी टोला लगावला आहे. भाजपाच्या दबावामुळेच त्यांना राजीनामा देणं भाग पडल्याचंही ते म्हणाले. 

रविशंकर प्रसाद म्हणाले, या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मौन अनेक प्रश्न उपस्थित करतात, ते या सर्व प्रकरणावर कधी बोलणार आहेत? उद्धव ठाकरे यांनी सरकार चालवण्याचा नैतिक आधार गमावला आहे. ही महाविकास आघाडी नव्हे तर महावसूली सरकार असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. 

मोठी बातमी! अनिल देशमुख यांचा गृहमंत्रीपदाचा राजीनामा 

मुंबई हायकोर्टाने जो आदेश दिला आहे त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलंय की या प्रकरणात प्रमुख आरोपीचं जर महाराष्ट्राचे गृहमंत्री असतील तर मुंबई पोलीस यामध्ये निष्पक्ष चौकशी करु शकत नाहीत. हे प्रकरण गंभीर असल्याचं कोर्टानं मान्य केलं आहे. आशा आहे की सीबीआयच्या चौकशीत सत्य समोर येईल. याची चर्चा झालीच आहे तर यामध्ये दूरपर्यंत अनेक खुलासे होतील. या सर्व प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी आम्ही मागणी करत आहोत, असं यावेळी रविशंकर प्रसाद म्हणाले.

स्वतंत्र भारताच्या इतिहासात आजवर असं झालं नाही की पोलीस आयुक्तांनी गृहमंत्र्यांवर अशा प्रकारचा गंभीर आरोप केला. सीबीआय या प्रकरणाची प्रामाणिकपणे चौकशी करेन. त्यांना वाटतं असेल तर त्यांना याप्रकरणी देशमुख यांच्यावर एफआयआर दाखल करण्याचा अधिकार आहे. कालपर्यंत संपूर्ण सरकार अनिल देशमुख यांना वाचवण्यात व्यस्त होतं. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कुठली नैतिकता आहे की नाही? सरकार चालवण्याच्या नैतिक आधार त्यांनी गमावला आहे, असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला. 

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप करणाऱ्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपांवर मुंबई हायकोर्टाने सीबीआयच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. हायकोर्टाच्या या आदेशानंतर देशमुख यांनी आपल्या राजीनामाचं पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवलं असून आपल्या ट्विटरवरही पोस्ट केलं. यामध्ये त्यांनी म्हटलं की, ते आपल्या मर्जीने राजीनामा देत आहेत. याप्रकरणी सीबीआय चौकशी सुरु झाल्याने या पदावर राहणं नैतिकतेच्या विरोधात असेल म्हणून मी स्वतःहून राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com