मोठी बातमी : अनिल देशमुखांनी दिला गृहमंत्रीपदाचा राजीनामा

maharashtra home minister anil deshmukh resignation letter
maharashtra home minister anil deshmukh resignation letter

मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख राजीनामा दिल्याची माहिती  राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली. सीबीआय चौकशी दरम्यान गृहमंत्री पदावर राहणं योग्य नसल्याच मत अनिल देशमुख यांनी  पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मांडलं. अनिल देशमुख यांच्या या निर्णाला शरद पवार यांनीही ग्रीन सिग्नल दिला. अनिल देशमुख यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सपूर्द केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबतचा निर्णय घेतील. मुख्यमंत्री त्यांचा राजीनामा नक्कीच स्वीकारतील, असं नवाब मलिक म्हणाले. 

वाझे यांच्या मार्फत महिन्याला 100 कोटी रुपये वसुली करण्याचे आदेश दिल्याचा खळबळजनक आरोप परमबीरसिंग यांनी केला होता. पहिल्यांदाच एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडून थेट गृहमंत्र्यांवर वसुलीचा आरोप झाल्यामुळं अखेर सरकारला अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यावा लागला आहे. सचिन वाझे प्रकरण सुरुवातीला वाझे आणि काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत मर्यादीत राहील असे वाटत होते. मात्र, विरोधक सुरुवातीपासून या प्रकरणी देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत होते. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार पत्रकार परिषद घेऊन देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. विधानसभेत आणि विधानसभेबाहेरही त्यांनी हा विषय लावून धरला होता. अखेर देशमुखांच्या राजीनाम्याची वेळ सरकारवर आल्याने आघाडी सरकारवर नामुष्की ओढवली आहे

काय घडलं?
25 फेब्रुवारी रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर एका कारमध्ये जिलेटीनच्या कांड्या सापडल्या. काही दिवसांनी कारचे मालक मनसूख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला. याप्रकरणात मुंबई पोलिस दलातील अधिकारी सचिन वाझे अडकल्यानंतर याप्रकरणाला राजकीय वळण लागले. विरोधीपक्षांनी विधानसभेत आणि बाहेरही हा मुद्दा उचलून धरत, कारवाईची मागणी केली. राज्य सरकारने याची गंभीर दखल घेऊन मुंबई पोलिस आयुक्त पदावरून परमबीरसिंग यांना हटविले. त्यांच्या जागी पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली. या कारवाईनंतर परमबीरसिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावरच खंडणीचे आरोप केले. बार मालक, हुक्का पार्लर यांच्याकडून महिन्याला 100 कोटी रुपये खंडणी गोळा करण्याचे आदेश अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दिले होते, असा आरोप परमबीरसिंग यांनी लगावला. या खंडणीच्या दबावामुळेच वाझेंनी कृत्यं केली का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

मुंबईच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अनिल देशमुखांचे आरोप
पोलिस दलातील बदल्यांसंदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांना एका सार्वजनिक कार्यक्रमात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर देशमुख म्हणाले होते की, पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या रुटीन नाहीत. काही पोलिस अधिकाऱ्यांकडून चुका झाल्यामुळेच ही कारवाई करण्यात आली आहे. देशमुख यांच्या या उत्तरानंतरच परमबीरसिंग यांनी लेटरबॉम्ब टाकला. लेटरबॉम्ब नंतर देशमुख यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. आपल्या चुका झाकण्यासाठी हे आरोप केल्याचं ट्विट देशमुख यांनी केलं. परंतु, त्यांनी मीडियाच्या प्रतिनिधींना कोणतिही प्रतिक्रिया दिली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com