शेतकऱ्यांच्या शंका दूर करू;कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचे आश्‍वासन 

Narendra-Tomar
Narendra-Tomar

नवी दिल्ली - देशभरातील विविध शेतकरी संघटना ज्या ठळक मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत ते तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केंद्र सरकारने आज पुन्हा एकदा फेटाळून लावली. शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी या कायद्यांमध्ये दुरुस्ती केली जाऊ शकते, असे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. ज्यावेळी सरकारचे प्रस्ताव स्वीकारून शेतकरी चर्चेसाठी तयार होतील त्यावेळी त्यांच्याशी खुल्या मनाने चर्चा करण्यात येईल, असेही तोमर यांनी नमूद केले. 

केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना पाठविलेल्या लेखी प्रस्तावातील मुद्यांबाबत तोमर व गोयल यांनी पत्रकारांना माहिती दिली. कंत्राटी शेतीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी खासगी कंपन्या व भांडवलदार बळकावतील ही शेतकऱ्यांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी कायद्यात तशी स्पष्ट तरतूद करण्याची तयारी केंद्र सरकारने दर्शविली आहे. शेतकऱ्यांना न्यायालयात जाण्याची मुभा देण्याची दुरुस्तीही केली जाऊ शकते. हमीभावाबाबत (एमएसपी)लेखी हमी देण्याचीही सरकारची तयारी आहे. तिन्ही कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे भले होणार आहे, शेतकऱ्यांची बाजार समित्यांच्या बेड्यांमधून मुक्ती मिळेल व कृषी क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तोमर म्हणाले 
बाजार समित्यांच्या बाहेर शेतमाल विकल्यास त्यावरही तेवढाच कर 
कंत्राटी शेतीत शेतकऱ्यांचा मालकी हक्क कायम राहणार 
शेतकऱ्याच्या जमिनींवर कोणताही उद्योगपती कब्जा करू शकणार नाही 
किमान हमीभाव यापुढेही कायम राहील, सरकारने त्यात वाढ केली 
शेतकरी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागू शकतील 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com