Ajaykumar Mishra : कोण शरद पवार.. मी नाही ओळखत, चार-पाच खासदार असणाऱ्या पक्षाचं अस्तित्व काय?

येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये (Lok Sabha Election) राज्यातील ४८ मतदारसंघांत भाजपचे खासदार निवडून आणणार आहे.
Sharad Pawar AjayKumar Mishra
Sharad Pawar AjayKumar Mishraesakal
Summary

मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर देश आर्थिक सक्षम झाला असून, अर्थव्यवस्थाही मजबूत झाली आहे.

सातारा : ‘शरद पवार (Sharad Pawar) कोण, मी ओळखत नाही. चार ते पाच खासदार असलेल्या पक्षाचे अस्तित्व काय असणार?’ अशी टीका करत शरद पवार यांनी निवडणुकीत माझ्या मतदारसंघात उभे राहून दाखवावे, असे आव्हान केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी दिले आहे.

दरम्यान, येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये (Lok Sabha Election) राज्यातील ४८ मतदारसंघांत भाजपचे खासदार निवडून आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाला सत्तेत येऊन नऊ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानिमित्त केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ‍श्री. मिश्रा (Ajay Kumar Mishra) बोलत होते.

या वेळी माजी खासदार अमर साबळे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, अतुल भोसले, विक्रम पावसकर, भरत पाटील, मनोज घोरपडे, धैर्यशील कदम, मदन भोसले, भीमराव पाटील आदी उपस्थित होते. मिश्रा म्हणाले, 'नरेंद्र मोदी सरकार २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर देशातील लोकांचे जीवनमान उंचाविण्याचा निर्धार केला होता. मतदारांना दिलेला शब्द पूर्ण करत देशातील अनेक गरजू नागरिकांमध्ये विविध योजनांना लाभ मिळाला आहे.'

Sharad Pawar AjayKumar Mishra
Kolhapur Band : कोल्हापुरात तणावपूर्ण शांतता; बंदला हिंसक वळण, जमावाकडून गाड्यांची तोडफोड, पोलिसांचा लाठीहल्ला

'स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबात शौचालय, उज्ज्वला गॅस, शेतकरी सक्षमीकरण, स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी जलजीवन योजना, डिजिटल शाळा, भारतीय परंपरेचे दर्शन, मातृवंदना योजना यासह विविध लोककल्याणकारी कामे भाजपने केली आहेत. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर देश आर्थिक सक्षम झाला असून, अर्थव्यवस्थाही मजबूत झाली आहे. भाजप सत्तेत येण्यापूर्वी देशात केवळ सात आयआयटी कॉलेज होते. आता नव्याने १५ आयआयटी उभारून सद्यःस्थितीत देशात २२ कॉलेजस आहेत.'

Sharad Pawar AjayKumar Mishra
Kolhapur Riots : बंदला हिंसक वळण; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह राजकीय नेत्यांनी काय दिली प्रतिक्रिया?

कोविडच्या काळात जगभरात सर्वाधिक लसीकरण देशात झाले आहे. ग्रामीण भागातील इंटरनेट सेवेने सर्वाधिक खेडी मोदी सरकारच्या काळात जोडली आहेत. २०१४ पूर्वी अनेक समस्यांनी ग्रासले होते. मात्र, मोदी सरकारच्या काळात भारताने जगभरातील देशांना आकर्षित केले आहे. दिल्ली येथे महिला कुस्तीपटूंच्या प्रकरणाची चौकशी सुरू असून, हे प्रकरण न्यायालयीन असल्याने याबाबत अधिक भाष्य करणे उचित नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Sharad Pawar AjayKumar Mishra
Satara : राजकीय नाराजी भोवली! सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली, जितेंद्र डुडी नवे जिल्हाधिकारी

दंगलीत दोषींवर कडक कारवाई

कोल्हापूर येथे झालेल्या दंगलीच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्राचे सरकार सक्षम आहे. या दंगली भडकविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे अजयकुमार मिश्रा यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com