नागपूरः आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महत्त्वाच्या पाच शहरांमध्ये हिंसा घडवून आणण्याचा नक्षलवाद्यांचा कट आहे, अशी माहिती पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे.
मार्च महिन्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागेल. या दरम्यानच राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, गोंदिया आणि नागपूरमध्ये हिंसा घडवण्यासाठी शहरी नक्षलवादी कट रचत असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांच्या नक्षलविरोधी विभागाचे पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी याबाबत माहिती दिली.
पाटील म्हणाले की, शहरी माओवादाने डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. बॅन असलेल्या युनायटेड फ्रंटच्या विंगने शहरी भागात संघटन करायला सुरुवात केली असून काही लोक विशिष्ट शहरांमध्ये पाठवले आहेत. त्यांच्या माध्यमातून शासनाविरोधात रोष निर्माण करण्यासाठी हिंसा घडवली जावू शकते.
''या लोकांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये नेटवर्क तयार केलं आहे. त्यांच्या ग्रुपमध्ये तरुणांचा समावेश केला जातोय.'' अशी माहिती संदीप पाटील यांनी दिली. 'टीव्ही ९ मराठी'ने हे वृत्त दिले आहे. वरील सर्व शहरांमध्ये सुरक्षा यंत्रणेला अलर्ट करण्यासाठी पावलं उचलली जात आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.