

आसाममध्ये कोळसा खाणीत अडकलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी भारतीय लष्कराकडून मोहिम सुरू आहे. रिलीफ टास्क फोर्स तैनात करण्यात आले आहे. दीमा हसाओ जिल्ह्यातील उमरांगशु परिसरात कोळसा खाणीत मजूर अडकले आहेत. मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी अडकलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी लष्कराकडे मदत मागतली होती. वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, भारतीय लष्कराने आसामच्या दीमा हसाओ जिल्ह्यातील उमरांगशु इथं खाणीत अडकलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी रिलीफ टास्क फोर्स तैनात केलंय.