'आपण असहिष्णू आणि दुटप्पी'; कॉमेडियन वीरदासच्या समर्थनार्थ उतरले सिब्बल आणि थरुर

'आपण असहिष्णू आणि दुटप्पी'; कॉमेडियन वीरदासच्या समर्थनार्थ उतरले सिब्बल आणि थरुर

नवी दिल्ली : वॉशिंग्टन डीसीमधील केनेडी सेंटरमध्ये कॉमेडियन वीर दासने (Vir Das) भारताबद्दल सादर केलेल्या एका कवितेवरून सध्या वाद निर्माण झालाय. 'टू इंडियाज्' (Two Indias) असं या कवितेचं शीर्षक आहे. या कवितेत त्याने भारताच्या दोन वेगवेगळ्या रुपांचं वर्णन केलंय, मात्र आता याच वर्णनावरुनच कवितेबद्दल वाद निर्माण झाला आहे. मात्र, आता वीर दासच्या कवितेचं समर्थन काँग्रेस नेते कपिल सिब्बल आणि शशी थरुर यांनी केलं आहे. कपिल सिब्बल यांनी म्हटलंय की, दोन भारत असल्याबाबत कुणीच शंका घेऊ शकत नाही. मात्र, एखाद्या भारतीयाने जगाला हे सांगू नये, अशी आपली इच्छा आहे. आपण असहिष्णू आणि दुटप्पी आहोत.

'आपण असहिष्णू आणि दुटप्पी'; कॉमेडियन वीरदासच्या समर्थनार्थ उतरले सिब्बल आणि थरुर
"पंतप्रधान मोदीही गांधींपासून प्रेरीत",भाजपनं कंगनाला फटकारलं

वीर दासचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. तर मुंबई पोलिसांकडे त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केल्याचीही माहिती समोर येत आहे. कपिल सिब्बल यांच्यासोबतच शशी थरुर यांनी देखील वीर दासचं समर्थन करत त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी म्हटलंय की, एखादा स्टँड-अप कॉमेडियन उभा असणं म्हणजे फक्त शारिरिक रित्या नव्हे तर नैतिक दृष्ट्याही उभा असतो. वीर दासने कोट्यवधी लोकांसाठी सहा मिनिटांसाठी एक गोष्ट सांगितलीय. हे हास्यास्पद असलं तरी विनोद नाही.

'आपण असहिष्णू आणि दुटप्पी'; कॉमेडियन वीरदासच्या समर्थनार्थ उतरले सिब्बल आणि थरुर
...अन् त्याने द्रविडसह WWE स्टारबद्दल व्यक्त केली मनातील भावना

काय आहे हे प्रकरण?

वीर दासच्या कवितेतील काही ओळींवरून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता. हा व्हिडीओ त्याने युट्यूबवर पोस्ट केला असून सहा मिनिटांच्या या परफॉर्मन्समध्ये वीर दासने भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याची टीका नेटकऱ्यांनी केलीये. "मी अशा भारतातून आलो आहे जिथे आम्ही दिवसा महिलांची पूजा करतो आणि रात्री त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला जातो," या कवितेतील ओळींवर अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे.

"मी अशा भारतातून आलो आहे जिथे मास्क घातलेली मुलं एकमेकांचा हात धरतात आणि जिथे नेते मास्कशिवाय एकमेकांना मिठी मारतात. मी अशा भारतातून आलो आहे जिथे आपण बॉलिवूडवरून विभागल्याचा दावा ट्विटरवर करतो आणि आणि थिएटरच्या अंधारात बॉलिवूडमुळे एकत्र आहोत," अशी त्याच्या कवितेची सुरुवात आहे. एकेकाळी महापुरुषांनी निर्माण केलेला भारत लवकरच फक्त आठवण म्हणून राहील, अशी भीती व्यक्त करत त्याने कवितेतून राजकारण, धर्म आणि राष्ट्रीयतेला स्पर्श केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com