Randip Surjewala
Randip Surjewala

Ayodhya Verdict : राजकारणासाठी श्रीरामाचा वापर आतातरी थांबेल : काँग्रेस

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाने राममंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे स्वागत केले आहे. भाजप व अन्य पक्षांना आता राममंदिराच्या मुद्द्यावरुन राजकारण करण्याची गरज पडणार नाही, असा टोलाही पक्षाचे प्रवक्ते राजदीप सुरजेवाला यांनी लगाविला आहे. 

अयोध्येतील वादग्रस्त जमीन ही रामलल्लाचीच असून, याठिकाणी राम मंदिर उभारण्यासाठी सरकारला ट्रस्ट बनवावे लागणार आहे. तसेच अयोध्येत सुन्नी सेंट्रल वक्‍फ बोर्डाला 5 एकर जमीन देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे सरकारच्या या ऐतिहासिक निकालाचे देशभरातून स्वागत करण्यात आले आहेत.  

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, की देशात शांततेचे सलोख्याचे वातावरण राहावे. काँग्रेस राम मंदिर बनविण्याच्या बाजूने आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही सन्मान करतो. देशात शांतीचे वातावरण कायम ठेवावे. श्रीराम हे त्यागाचे प्रतिक आहेत, ते सर्वधर्म समभाव, प्रेम आहे. भेदभावासाठी कधी याचा वापर होऊच शकत नाही. 1993 मध्ये काँग्रेस सरकारनेच ही जमीन अधिग्रहण केली होती. अयोध्येतील निकाल हा श्रेय घेण्यासारखा नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com