'कलम 370' हटवल्यामुळे होणारे फायदे पाहा...

article 370
article 370

नवी दिल्लीः जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटण्याचे निर्णय घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र, 'कलम 370' हटवल्यामुळे सात महत्त्वपूर्ण बदल अंमलात येणार आहेत.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचे 'मिशन काश्मीर' आज (सोमवार) फत्ते झाले आहे. काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याबाबतची, त्यातील वादग्रस्त तरतुदी हटवण्याची ऐतिहासिक घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत केली. जम्मू-काश्मीरचे विभाजन करण्याची शिफारसही करण्यात आली आहे. त्यानुसार, जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश असेल. दिल्लीप्रमाणे त्यांची स्वतंत्र विधानसभा असेल, पण दर्जा केंद्रशासित प्रदेशाचा राहील. शिवाय, लडाख हा वेगळा केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात येईल.

कलम 370 हटवण्याच्या निर्णयामुळे होणारे बदल...
1. जम्मू-काश्मीरला स्वायत्त राज्याचा दर्जा राहणार नसल्याने दुहेरी नागरिकत्वाचा विषय संपुष्टात येईल.
2. जम्मू-काश्मीरबाबत कुठलाही नवा कायदा करण्यासाठी आता राज्य सरकारच्या संमतीची गरज नसेल.
3. राज्य सरकारच्या कायद्यात केंद्र सरकार हस्तक्षेप करू शकेल.
4. देशातील अन्य राज्यातील नागरिकांना आता जम्मू-काश्मीरमध्ये संपत्ती खरेदी करता येईल, गुंतवणूक करता येईल.
5. जम्मू-काश्मीर पोलिस केंद्र सरकारच्या, केंद्रीय गृहखात्याच्या अखत्यारित येतील.
6. जम्मू-काश्मीर राज्याचा स्वतंत्र झेंडा होता. यापुढे तो नसेल.
7. राज्यावर आर्थिक आणीबाणी लागू करण्याचा अधिकार मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com