विजेचे संकट ओढवणार! विजेची मागणी ३८ वर्षांच्या उच्चांकावर

power cut
power cutPower cut

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णता शिगेला पोहोचली आहे. अशात वीजपुरवठा खंडित झाल्याने मोठे संकट निर्माण होऊ शकते. मागील काही दिवसांपासून पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, हरियाणा, राजस्थान आणि तेलंगणामध्ये वीज कपात वाढली आहे. महाराष्ट्र हे देशातील प्रमुख औद्योगिक राज्यांपैकी एक आहे. मात्र, कोळशाच्या पुरवठ्यामुळे अनिवार्य कपातीकडे वाटचाल करीत आहे. यामुळे विजेचे संकट ओढवणार (Will cause power crisis) आहे.

महाराष्ट्रात अडीच हजार मेगावॉट विजेचा (Electricity) तुटवडा आहे. यामुळे अनिवार्य कपात (Power cut) सुरू केली आहे. ही कपात ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात केली जाणार आहे. राज्यात २,५०० ते ३,००० मेगावॉट विजेचा तुटवडा असल्याचे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने निवेदन जारी करून म्हटले आहे. आणखी एक औद्योगिक राज्य आंध्र प्रदेशात वीज पुरवठ्यात ८.७ टक्के तुटवडा आहे. त्यामुळे राज्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे, असा रॉयटर्सचा अंदाज आहे.

power cut
मोठी बातमी : नवाब मलिक यांची संपत्ती ईडीकडून जप्त

मागील काही दिवसांपासून पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, हरियाणा, राजस्थान आणि तेलंगणामध्ये वीज कपात (Power cut) वाढली आहे. महाराष्ट्रही अनिवार्य कपातीकडे वाटचाल करीत आहे. दुसरीकडे गुजरात आणि तामिळनाडूने कपात टाळण्यासाठी चढ्या दराने वीज खरेदी सुरू केली आहे. मागणीच्या तुलनेत गेल्या आठवड्यात देशात १.४ टक्के विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. मागच्यावर्षी ऑक्टोबरमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा ही तूट केवळ एक टक्के होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा संकट अधिक आहे.

पुरवठा कमी असल्याने विजेचे संकट!

देशातील विजेची (Electricity) मागणी ३८ वर्षांच्या उच्चांकावर आहे. कोळशाचा (coal) पुरवठा नऊ वर्षांतील सर्वांत कमी आहे. पुरवठा कमी असल्याने काही दिवसांत विजेचे संकट निर्माण होऊ (Will cause power crisis) शकते. यामुळेच देशातील अनेक भागात वीजपुरवठा खंडित होण्यास सुरुवात झाली आहे, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मागील काही दिवसांमध्ये अनेक उद्योग ५० टक्के क्षमतेने सुरू झाले आहेत. याशिवाय ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे विरोधी पक्ष सरकारवर हल्लाबोल करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com