प्रोफेशनल किलर प्रमाणे काम करा..! माजी कर्मचाऱ्याचा रिपब्लिक वृत्तवाहिनी व अर्णब गोस्वामीबद्दल खुलासा

Arnab_Goswamy.png
Arnab_Goswamy.png

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचे प्रकरण चर्चेत आहेत. या प्रकरणाबरोबर आणखी एक माध्यमांतील चेहरा चर्चेत आहे. तो चेहरा म्हणजे अर्णब गोस्वामी. अर्णब गोस्वामी यांचे रिपब्लिक टीव्ही हे चॅनेल सध्या टीआरपीमध्ये अव्वल आहे. पण टीआरपीसाठी हे चॅनेलकाम कसं करतंय याचा धक्कादायक खुलासा या चॅनेलमध्ये काम केलेल्या एका कर्मचाऱ्यानी केला आहे. त्या कर्मचाऱ्याचे नाव आहे तेजिंदरसिंग सोधी. न्युजलॉंड्रीच्या वृत्तानुसार अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर टीआरपीमध्ये नंबर वन असलेल्या रिपब्लिक वृत्तवाहिनीसंदर्भात तेजिंदरसिंग सोधी यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. तसेच संपादक अर्णब गोस्वामी यांची कशाप्रकारे मक्तेदारी आहे हे पटवून दिले आहे.  

२७ ऑगस्टला तेजिंदरसिंग सोधी यांनी ट्विटरवर रिपब्लिक टीव्हीचे  जम्मू-काश्मीर ब्यूरोचा प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे असं ट्विटरवर जाहीर केलं . त्यात त्यांनी  "साडेतीन वर्षांच्या कामाच्या अनुभवानंतर पत्रकारितेची हत्या केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणारे पत्र लिहिले आणि अनेक खुलासे केले आहेत. त्यांच्या राजीनाम्याची माहिती १ सप्टेंबरमध्ये 'पी-गुरूज' या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली होती, त्यात दावा केला होता की ज्यामुळे पत्रकाराचा "रिपब्लिक टीव्हीमध्ये काम करण्याचा धक्कादायक अनुभव" दिसून येतो. यानंतर हे पत्र लिखित राजीनाम्यांप्रमाणेच शेवटी ट्विटरवर पोहोचलेच. रिपब्लिक टीव्हीच्या न्यूजरूममधील तेजंदरच्या अनुभवाविषयी माहिती घेण्यासाठी  अनेक माजी कर्मचार्‍यांशी संवाद साधल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.  

प्रोफेशनल किलर प्रमाणे काम करा..!

रिपब्लिक टीव्हीच्या प्रमुखाने एचआरला तेजिंदरने लिहलेले ईमेल, कंपनीत असताना त्यांनी सामना केलेल्या अनेक विषयांवर चर्चा केली. ते म्हणतात, की त्यांनी जेव्हा रिपब्लिक टीव्हीवर काम करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्याचे मालक आणि संपादक अर्णब गोस्वामी यांनी त्यांना चॅनेल "समाजात दबलेल्यांचा आवाज बनेल" याची हमी दिली होती. पण तेजिंदर म्हणतात की, लवकरच त्यांना समजले की अर्णब हे पत्रकारांचा वापर करून घेत आहेत

सुनंदा पुष्कर प्रकरणी तेजींदर धक्कादायक खुलासा

ते म्हणाले की,  अर्णब गोस्वामी यांनी, सुनंदा पुष्कर यांच्या निधनानंतर त्यांच्या वडिलांना घेराव घालून शशी थरूर यांच्याविरोधात बोलण्यास भाग पाडण्यात आले होते. तसेच जम्मू-काश्मीरमधील ब्यूरो चीफ म्हणून त्यांना राज्याचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांना लक्ष्य करून त्यांच्याविरूद्ध बोलायलाही सांगितले", असा खुलासाही तेजिंदर यांनी नमूद केला आहे. त्यांनी हे देखील कबूल केले की, त्यांनी गोस्वामी यांच्या सांगण्यावरून मुफ्ती यांना देशद्रोहाी आणि विश्वासघातकी म्हणून दर्शविण्यात यावे".न्यूजलॉंड्रीशी झालेल्या संभाषणात तेजिंदरने कबूल केले की, व्हायरल होत असलेले पत्र हे त्यांनी स्वतः लिहले आहे.

त्यांचे म्हणणे आहे की, हे ईमेल सार्वजनिक करून त्यांनी एकप्रकारे जोखीमच घेतली आहे. त्यांना हे देखील ठाऊक आहे की हे सर्व झाल्यानंतर माध्यमांच्या जगात कदाचित त्यांना नोकरीही मिळू शकणार नाही. हे एक असे जग आहे जिथे मोठे पत्रकार आपल्या न्यूज रूम्स आणि कंपन्यांमध्ये काय घडत आहेत याबद्दल बोलतही नाहीत. तेजिंदर सांगतात, "कुणीतरी याचा खुलासा करायलाच हवा होता. जो मी केला. आपण जे काम करतो ती पत्रकारिता नाही, आपण उगाच वाईट गोष्टींसाठी टार्गेट बनत आहोत हे तेव्हा कळलं जेव्हा मला हातात पोस्टर आणि काळी पट्टी बांधून घेऊन कॉंग्रेसच्या कार्यालयाबाहेर उभे राहून घोषणा द्यायला लावल्या. तेजिंदर पुढे म्हणाले, "माझे काम एक प्रोफेशनल किलरप्रमाणेच होते. मला ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांना काहीही करून देशद्रोही असल्याचे दाखवायला सांगितले होते.  

आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे रिपब्लिक टीव्ही संपादकांना या अशा प्रकारच्या पत्रकारितेचे नाव सापडले आहे. ज्याला ते "चेस सिक्वेन्स" असे म्हणतात. म्हणजे सतत एखाद्याचा पाठलाग करणे. पत्रकारांना विरोधी पक्षातील लोकांचा पाठलाग करण्यास सांगितले जाते. माईक जबरदस्तीने त्याच्या तोंडासमोर धरून उत्तरं विचारायला लावले जाते.

घराण्याची मक्तेदारी

राजीनामा देताना तेजिंदर रिपब्लिक टीव्हीमध्ये असलेल्या घराण्याविषयीही बोलले. त्यांचा असा दावा आहे की हिंदी आणि इंग्रजी दोन्ही वाहिन्यांच्या कामकाजात अर्णबची पत्नी सौम्यब्रता रे हा अंतिम आवाज आहे. तेजिंदर अर्णबबद्दल म्हणतात, "ते सोनिया गांधींना सुपर पंतप्रधान म्हणतात. परंतु त्यांची पत्नीच तेथील सुपर एडिटर आणि रिपब्लिक टीव्हीची व्यवस्थापकीय संपादक आहे. सौम्यब्रता रे च्या परवानगीशिवाय तिथले पानही हलू शकत नाही." 

माजी कामगारांशी संवाद

न्यूजलॉंड्रीने रिपब्लिक वृत्तवाहिनीच्या अनेक माजी ज्येष्ठ संपादक, अँकर आणि पत्रकारांशी संवाद साधला.  हा संवाद तेजेंद्रच्या आरोपावरील त्यांचे मत जाणून घेण्यासाठी साधला गेला. आश्चर्यकारक म्हणजे आमच्याशी बोलणारे सर्व लोक आपले नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवरच बोलले. कारण की त्यांना भीती होती. रिपब्लिक संस्थेबद्दल बोलल्यामुळे ते बेरोजगार होऊ शकतात. भारतातील बर्‍याच माध्यम संस्थांमध्ये कर्मचार्‍यांना इतर वृत्तसंस्थांशी बोलण्यास मनाई करण्याचे कठोर नियम आहेत, त्यामुळे भारतातील माध्यमांवर बातमी देणे दुहेरी अडचणीचेच काम आहे. एका व्यक्तीने सांगितले की तेजिंदरच्या ईमेलवरून स्पष्टपणे दिसून आले आहे की, या क्षेत्रात काही अनुभवी लोक आहेत ज्यांना अर्णबबरोबर काम करायला आवडेल. "रिपब्लिक टीव्हीमध्ये त्यांनी जे वातावरण तयार केले ते वृत्तपत्र नसून एक न्यायालय आहे. सामान्यत: एका संस्थेत कनिष्ठ, मध्यम-स्तरीय आणि वरिष्ठ व्यवस्थापक असतात, परंतु अर्नबने बिनाअनुभवी तरुण न्यूजरूममध्ये भरले आहेत. जे कोणत्याही प्रकारे त्याचा विरोध करत नाहीत. रिपब्लिक टीव्हीच्या सर्वात अनुभवी लोकांनी त्याला सोडले आहे. 

'जी-हुजूर' करणाऱ्यांची मुजरेगिरी

जुन्या रिपब्लिक टीव्ही कर्मचार्‍यांच्या म्हणण्यानुसार, अर्णबने आपल्या आजूबाजूस निष्ठावंत लोकांचे एक मंडळ तयार केले आहे, ही मंडळी अर्णबच्या तालावर नाचतात. अर्नबने चॅनेलची लगाम आपल्या पत्नीला दिली आहे. त्याने अत्यंत जवळच्या लोकांचे एक छोटे मंडळ केले आहे आणि जे त्याच्यावर निष्ठा दर्शवतात आणि त्यांना बक्षीस मिळते.

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com