उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकी दरम्यान (UP Election 2022) भटक्या जनावरांचा मुद्दा घेऊन समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी योगी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी याच मुद्दयावर ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत योगींवर हल्लाबोल केला आहे.
अखिलेश यादव यांनी भटक्या जनावरांचा मुद्दा घेऊन पुन्हा एकदा योगी सरकारवर निशाणा साधला आहे.
निवडणुकीनंतर पहिल्यांदाच अखिलेश यादव यांनी आज सीतापूरला जनतेशी संवाद साधला. त्यानंतर ते परतीच्या प्रवासाला निघाले. यावेळी त्यांच्या ताफ्याच्या मध्येच एक भटके जनावर आले. याचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे. हे पाहून त्यांनी काव्यात्मक शैलीत टोमणा मारला आहे. ते म्हणाले, सफ़र में साँड़ तो मिलेंगे… जो चल सको तो चलो…उत्तर प्रदेशात प्रवास करणे खूप कठीण आहे असा उपरोधक टोला त्यांनी लगावला.
समाजवादी पक्षाचा नैतिक विजय - अखिलेश यादव
अखिलेश यादव यांनी महागाईच्या मुद्यावरून पुन्हा एकदा योगी सरकारवर निशाणा साधला आहे. आजही मुलभूत प्रश्न जसेच्या तसे आहेत. भाजप सरकारने यावर तोडगा काढलेला नाही. विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्याच्या मुद्यावरून अखिलेश म्हणाले, या निवडणूकीत समाजवादी पक्षाने नैतिक विजय मिळवला आहे. लोकांच्या सहकार्यामुळे आणि सपा कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यामुळे समाजवादी पक्ष वाढत आहे. याउलट भाजपाची संख्या कमी होताना दिसत आहे. दोन्ही मतांची टक्केवारी आणि जागा वाढल्या आहेत असेही ते म्हणाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.