

How Marathi Movements Shook Delhi: The Untold History of Protests That Changed India
esakal
दिल्ली, ही राजधानी केवळ सत्तेचे केंद्र नाही, तर इतिहासाच्या अनेक लढ्यांचा साक्षीदार आहे. जेव्हा मराठी माणूस आपल्या न्याय्य हक्कांसाठी, अस्मितेसाठी किंवा देशातील अन्यायाविरुद्ध उभा राहतो, तेव्हा दिल्लीची राजकीय इमारत हादरते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या स्वप्नापासून ते पेशवाई काळातील महादजी शिंदे यांच्या दिल्लीवरील आक्रमणांपर्यंत मराठ्यांनी दिल्लीला अनेकदा आव्हान दिले. दिल्लीवर राज्य देखील केले. ते युद्ध होते, राजकीय मोहिमा होत्या. स्वातंत्र्यलढ्यात स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळकांपासून ते क्रांतिसूर्य नाना पाटील यांच्या पत्री सरकारपर्यंत अनेक स्वातंत्र्यवीरांनी इंग्रज सत्तेला कडवे आव्हान दिले. स्वातंत्र्यानंतर मात्र मराठी लोकांनी शांततामय आंदोलनांच्या माध्यमातून दिल्लीला घाम फोडला. हे आंदोलन दिल्लीच्या सत्ताधाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या दाखवणारे ठरले, याचा आंदोलनाचा मागोवा...