शिव- पार्वतीपुत्र गणेश म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके गणपती बाप्पा यांच्या बालपणाच्या अनेक कहाण्या पुराणात सांगितल्या गेल्या आहेत. गणपती बाप्पांच्या खोडकर कृत्याने देवतांनाही त्यांच्यापुढे हात टेकावे लागत होते. असाच प्रत्यय विष्णू देवालाही आला. गणपती बाप्पाने अस काय केल कि विष्णू देवाला त्यांच्यासमोर हात टेकावे लागले ते या कथेतून आपण जाणून घेऊया.
आपण पाहतो विष्णू देवांकडे नेहमी एक शंख असतो. एकदिवस त्यांच्या लक्षात आलं की तो शंख सापडत नाहीये, यामुळे ते नाराज झाले. तो शंख शोधण्यासाठी त्यांनी आपली संपूर्ण शक्ती एकवटली. शंखाचा शोध सुरू असताना दुरवरुन अचानक शंखाचा आवाज ऐकू येऊ लागला. विष्णू देव त्या आवाजाचा शोध घेत असताना तो आवाज कैलास पर्वत वरून येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. कैलास पर्वतावर पोहचताच त्यांना दिसले की गणपती बाप्पा हा शंख फुंकण्यात (वाजविण्यात) व्यस्त आहे. आपल्याला तो शंख मागितल्यावर सहजा सहजी मिळणार नाही हे विष्णू देवाला माहीत होते. तेव्हा त्यांनी शंकराला शंख परत मिळवून देण्याची विनंती केली. शंकरांनी विष्णू देवाला सांगितले की हा शंख गणेशाने घेतला आहे त्यामुळे आता तो काही तुम्हाला सहजा सहजी शंख परत करणार नाही, आता तुम्हाला त्याला मनवूनच त्याच्याकडून शंख परत घ्यावा लागेल. तेव्हा विष्णू देव शंकरांना म्हणाले नेमके आता मी काय करावे ते तरी मला सांगा.
शंकरांनी विष्णू देवाला गणेशाला प्रसन्न करण्यासाठी गणपतीचे पुजन करायला सांगितले. तेव्हा विष्णू देवाने मनोभावे बाप्पाची पूजा केली; हे पाहून गणपती बाप्पा अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी विष्णू देवाला त्यांचा शंख परत केला.
यातून आपल्याला विष्णू देवांसारखे इतके महान देवही बाप्पाची पूजा करता हे समजते. त्यांच्या या पुजनातून आपल्याला नम्रतेची शिकवण मिळते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.