उपराष्ट्रपतींच्या अरूणाचल प्रदेश दौऱ्यावर चीनचा संताप!
देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू नऊ ऑक्टोबर रोजी अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर होते. नायडू यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यामुळे चीनने प्रचंड संताप व्यक्त केला आहे. त्यानंतर भारतानेही चीनच्या या आक्षेपाला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
चीनच्या आक्षेपाला भारताचेही चोख प्रत्युत्तर
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू नऊ ऑक्टोबर रोजी अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर होते. या भेटीदरम्यान त्यांनी राज्य विधानसभेच्या विशेष सत्रालाही संबोधित केले. विशेष सत्राला संबोधित करताना उपराष्ट्रपतींनी अरुणाचल प्रदेशचा वारसा सविस्तर मांडला होता. दरम्यान देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या अरुणाचल प्रदेश भेटीवर चीनने आपला आक्षेप व्यक्त केला आहे.
त्यानंतर बुधवारी भारतानेही चीनच्या या आक्षेपाला चोख प्रत्युत्तर दिले आहे.भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, आम्ही अशा टिप्पण्या नाकारतो. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे. भारतीय नेते नियमितपणे राज्याला भेट देतात, जसे ते भारतातील इतर कोणत्याही राज्यात करतात, “भारताच्या राज्यात एखाद्या नेत्याच्या देशाबाहेर जाण्यावर चीनचा आक्षेप अनावश्यक आहे आणि भारतीय नागरिकांच्या समजण्याच्या पलीकडे आहे. आम्ही चीनच्या अधिकृत प्रवक्त्याचे विधान पाहिले आहे. आम्ही अशा गोष्टी नाकारतो. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे.” असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
“अरुणाचल प्रदेशला चीन सरकारने कधीही मान्यता दिली नाही”
भारतीय सरकारने स्थापन केलेल्या एकतर्फी आणि बेकायदेशीरपणे तथाकथित अरुणाचल प्रदेशला चीन सरकारने कधीही मान्यता दिली नाही. आणि भारतीय नेत्यांच्या संबंधित प्रदेशातील भेटींना तीव्र विरोध आहे, सीमा मुद्द्यावर चीनची स्थिती सुसंगत आणि स्पष्ट आहे. असे सांगत उपराष्ट्रपतींच्या दौऱ्यावर चीनने प्रचंड संताप व्यक्त केला आहे. बीजिंगने बुधवारी म्हटले की त्यांनी अरुणाचल प्रदेशला एक राज्य म्हणून मान्यता दिलेली नाही. उपराष्ट्रपतींच्या भेटीवर आपला आक्षेप व्यक्त करताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान म्हणाले,
अरुणाचल प्रदेशवरून चीनसोबत भारताचा वाद खूप जुना
अरुणाचल प्रदेशवरून चीनसोबत भारताचा वाद खूप जुना आहे. चीन अरुणाचल प्रदेशला दक्षिण तिबेटचा भाग मानतो. दोन्ही देशांची ३,५०० किलोमीटर लांब सीमा आहे. सीमा वादामुळे दोन्ही देश १९६२ मध्ये रणांगणात समोरासमोर उभे राहिले होते, पण सीमेवरील काही भागात अजूनही वाद आहेत जे कधीकधी तणावाचे कारण बनतात.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.