

नवी दिल्ली, ता. २० : काबूलमध्ये १६ मार्च रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जखमींच्या उपचारांसाठी भारताने मदतीचा हात पुढे केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने २.५ टन आपत्कालीन औषधे, वैद्यकीय साहित्य, किट्स आणि उपकरणांची मदत काबूल येथे पाठवली.