आधी PoK चा ताबा सोडा; संयुक्त राष्ट्रांसमोर भारताची पाकिस्तानला तंबी!

Ind_Pak
Ind_Pak

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने व्याप्त काश्मीर हे पाकिस्तानने भारताचे अवैधरीत्या बळकावलेले क्षेत्र परत करण्याबाबतचा ठराव करून सात दशके उलटूनही त्यांनी अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे पाकिस्तानने आधी भारताचा काश्मीरचा बळकावलेला भाग सोडावा, असे म्हणत संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचे कान टोचले. 

संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या कायम प्रतिनिधी रुचिता भंडारी यांनी बुधवारी पाकिस्तानच्या बाजूने दहशतवाद्यांना होत असलेली मदत आणि त्यांच्या छुप्या कारवायांचा लेखाजोखाच मांडला. पाकिस्तानला सडेतोड उत्तर देताना व्याप्त काश्मीरचा ताबा त्यांनी सोडायला हवा, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.

तसेच, संयुक्त राष्ट्रांच्या अहवालाप्रमाणे पाकिस्तानात २५ दहशतवादी संघटना आणि अनेक दहशतवादी सक्रिय असून, यातील काही दहशतवाद्यांनी पाकिस्तानात वारंवार निवडणुकाही लढविल्या आहेत, या गोष्टींना पाकिस्तान कशा प्रकारे नाकारू शकतो,’ असा सवालही त्यांनी या वेळी उपस्थित केला.

''भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही असणारा देश आहे. याबरोबरच या देशाने आपल्या देशातील नागरिकांमध्ये लोकशाहीचे संस्कार करत लोकशाहीचा जगापुढे आदर्श निर्माण केला आहे. मात्र, पाकिस्तानमधील जनतेला अजून खऱ्या लोकशाहीचा अनुभव मिळाला नाही,'' अशा शब्दांत भंडारी यांनी पाकचा समाचार घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com