
चीन - कोरोना विषाणूच्या जीवेघेण्या जाळ्यात जगभरातील कानाकोपऱ्यात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारने विषेश प्लॅन आखला आहे. 7 ते 13 मे दरम्यानच्या कालावधीत विविध देशात अडकून असलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्याची योजना आणि भूमिका केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आली आहे. मात्र चीनमध्ये अडकून असलेल्या भारतीय नागरिकांना भारतात आणण्यासाठी तूर्तास कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. पण चीनमधून मायदेशी परतण्यासाठी इच्छूक असलेल्यांची नोंदणी सुरु करण्यात आली आहे.
चीनमधून मायदेशी परतण्यास इच्छूक असणाऱ्यांनी भारतीय दूतवासांशी संपर्क करावा,असे आवाहन करण्यात आले आहे. मजूर, वयोवृद्ध, गर्भवती महिला आणि विद्यार्थी यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही दूतवासांनी स्पष्ट केले आहे. चीनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी दूतवासांनी एक निवेदन जारी केले आहे.
या निवेदनात म्हटलंय की, भारतामध्ये परत जाण्यासाठी इच्छूक असणाऱ्यांना काही अटी मान्य कराव्या लागतील. यात भारतात परतल्यानंतर 14 दिवस क्वारंटाईनचे पालन करणे आणि प्रवासाचा खर्चाची रक्कम अदा करणे या गोष्टींचा समावेश आहे. याशिवाय प्रवास स्वत:च्या जबाबदारीवर करत आहोत, हे देखील लिहून द्यावे लागेल. चीनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी नेण्यासंदर्भात अद्याप कोणताही प्लॅन आखलेला नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
परदेशात अडकलेल्या नागरिकांना टप्प्याटप्याने भारतात आणण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात चीनमध्ये अडकलेल्या नागरिकांचा समावेश नाही. ज्यांना मायदेशी परतण्याची इच्छा आहे त्यांनी विवरण आणि सहमती पत्र ईमेलद्वारे दूतवासांना पाठवावे, असा उल्लेख निवेदनात केल्याचे दिसते.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
चीनच्या वुहानमधून जगभरात वेगाने पसरलेल्या कोरोनामुळे अनेक राष्ट्रांची डोकेदुखी वाढली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी कोणतीही लस उपलब्ध नसल्यामुळे या महारोगासंदर्भात भिती अधिक वाढत आहे. सध्याच्या घडीला कोरोनाच्या प्रादुर्भावत असणारी राष्ट्रे लॉकडाऊनच्या माध्यमातून सोशल डिस्टन्सिंग राखत कोरोनाविरोधात लढा देत आहेत. भारतासह अनेक राष्ट्रांवर लॉकडाऊनची परिस्थिती ओढावली आहे. दरम्यान परदेशात नोकरीसाठी असलेल्या काही भारतीयांवर नोकऱ्या गमावण्याची वेळ आली आहे. शिक्षणासाठी तसेच पर्यटनासाठी परदेशी गेलेल्या भारतीय नागरिक लॉकडाऊनच्या कोंडीत अडकला आहे. केंद्र सरकारने त्यांना पुन्हा भारतात आणण्यासाठी मोहिम हाती घेतली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.