भारताचे यूएनमधील भाषण

दहशतवादाचा निवडक विचार नको ‘यूएन’च्या सुरक्षा परिषदेत भारताची भूमिका
india flag
india flagsakal

न्यूयॉर्क: पाकिस्तान स्थित लष्करे तैय्यबा आणि जैशे मोहंमद या दहशतवादी संघटनांच्या कारवायांना खतपाणी घातले जात असून दहशतवादाच्या समस्येकडे निवडक दृष्टिकोनातून पाहता येणार नाही. दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या आणि याबाबत दुटप्पी भाषा करणाऱ्यांविरोधात देखील बोलायचे धाडस असणे गरजेचे असल्याची सडेतोड भूमिका भारताने आज मांडली.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताच्या अध्यक्षतेखाली आज ‘आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला दहशतवादी कृत्यांमुळे निर्माण झालेला धोका’ या विषयावर परिसंवाद पार पडला, त्यात बोलताना परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी उपरोक्त मत मांडले. शेजारील इराकमध्ये इसीसचा प्रसार होऊ लागला असून हक्कानी नेटवर्कच्या कारवायांमुळे जगाच्या चिंता वाढल्या आहेत.

india flag
एका नागरिकाला घेऊन विमान रोमानियाला परतले

अफगाणिस्तान असो अथवा भारत लष्करे तैय्यबा, जैशे मोहंमद या दहशतवादी संघटना तेथे सक्रिय असल्याचे जयशंकर म्हणाले. सध्या आपण ज्या समस्येला सामोरे जात आहोत तिच्याबाबत सुरक्षा परिषदेला निवडक, सोयीचा विचार करून आत्मसंतुष्ट होता येणार नाही. दहशतवाद्यांच्या आश्रयस्थानाकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही किंवा त्यांच्या स्त्रोतांकडे देखील डोळेझाक करणे शक्य नाही असेही त्यांनी नमूद केले.

अफगाणिस्तानातील ताजा घटनाक्रम जगाची चिंता वाढविणारा असून तेथे तालिबानी सत्ताधीश बनल्याने प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com