कंगाल श्रीलंकेत पुन्हा आणीबाणी जाहीर; विक्रमसिंघेंचे आदेश

यापूर्वी 13 जुलै रोजी तत्कालीन राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या विरोधात प्रचंड गदारोळ आणि जनक्षोभामुळे श्रीलंकेत आणीबाणी लागू करण्यात आली होती.
sri lanka
sri lankaSakal

कोलंबो : भीषण आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेत (Sri Lanka) आजपासून पुन्हा एकदा आणीबाणी (Emergency ) लागू करण्यात आली आहे. देशाचे कार्यवाह अध्यक्ष रोनिल विक्रमसिंघे (Ranil Wickremesinghe) यांनी हा आदेश दिला आहे. आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था आणि जीवनावश्यक वस्तूंचा सुरळीत पुरवठा करण्यासाठी 18 जुलैपासून पुन्हा आणीबाणी लागू करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आलेल्या आदेशात नमुद करण्यात आले आहे. (Sri Lanka Latest News In Marathi)

यापूर्वी 13 जुलै रोजी तत्कालीन राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या विरोधात प्रचंड गदारोळ आणि जनक्षोभामुळे श्रीलंकेत आणीबाणी लागू करण्यात आली होती. राजपक्षे देशातून पळून गेल्यानंतर विक्रमसिंघे यांना हंगामी अध्यक्ष बनवण्यात आले. त्यांच्या निवडीनंतर देशातील आणीबाणी उठवण्यात आली होती, मात्र आता आठवडाभरातच पुन्हा एकदा आणीबाणी जाहीर करण्याची वेळ आली आहे.

sri lanka
Lalit Modi नी मागितली Ranveer Singh ची माफी; जाणून घ्या काय आहे प्रकरण

गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळापासून श्रीलंकेतील परिस्थिती अनियंत्रित झाली असून, देशात जीवनावश्यक वस्तू आणि इंधनाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. यापूर्वीच्या राजपक्षे सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप करत सामान्य नागरिकांनी अनेकदा रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणात आंदोलन केले आहे. याशिवाय गेल्या आठवड्यात संतप्त आंदोलकांनी राजधानी कोलंबे येथील राष्ट्रपती भवनावर ताबा मिळवला होता. यानंतर तत्कालीन राष्ट्रपती गोटाबाया यांनी देश सोडला. देश सोडल्यानंतर गोटाबाया राजपक्षे आधी मालदीवला गेले त्यानंतर तेथून त्यांनी सिंगापूर गाठले.

आणीबाणीचा दीर्घ इतिहास

श्रीलंकेत आणीबाणीचा मोठा इतिहास आहे. 1948 मध्ये इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि त्याआधीही अनेकवेळा देशाने आणीबाणी अनुभवली आहे. 1958 मध्ये स्वातंत्र्यानंतर सिंहली ही एकमेव भाषा म्हणून स्वीकारल्याच्या निषेधार्थ परिस्थिती बिघडल्यानंतर देशात पहिल्यांदा आणीबाणी लागू करण्यात आली होती.

sri lanka
देशातील अनेक भागात पावसाचा हाहाकार, महाराष्ट्रात आतापर्यंत 104 मृत्यू

LTTE चळवळीमुळे 28 वर्षांची आणीबाणी

श्रीलंकेत 1983 ते 2011 पर्यंत सर्वात मोठी आणीबाणी लावण्यात आली होती. श्रीलंकन ​​तमिळ आणि सिंहली यांच्यातील हिंसक आंदोलनामुळे जवळपास 28 वर्षे आणीबाणी लागू करण्यात आली होती. लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम (LTTE) हा तामिळ गट श्रीलंकेत वेगळ्या तमिळ राज्याची मागणी करत होता. गृहयुद्धाच्या काळातही आणीबाणीची स्थिती कायम होती. यानंतर 2018 मध्ये मुस्लिमविरोधी हिंसाचारामुळे आणीबाणी लागू करण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com