Fact Check : RO चं पाणी पिणं ठरतंय शरीरासाठी घातक?

RO च्या पाण्यामुळे शारीरिक समस्या निर्माण होतात का?
Fact Check : RO चं पाणी पिणं ठरतंय शरीरासाठी घातक?

अनेक आजारांचं मूळ कारण अशुद्ध आणि अस्वच्छ पाणी असतं हे सारेच जण जाणतात. म्हणूनच, पाणी कायम उकळून, गाळून प्यावं असं सल्ला डॉक्टर आणि घरातील थोरामोठ्यांकडून देण्यात येतो. परंतु, सध्याच्या काळात अनेकांच्या घरात स्वच्छ पाण्यासाठी RO बसवण्यात आले आहेत. RO चं पाणी शुद्ध असल्यामुळे ते पिण्यायोग्य असल्याचा दावा अनेक कंपन्यांनी केला आहे. तसंच अनेकांनी या स्वच्छ पाण्याचा अनुभवदेखील घेतला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून RO च्या पाण्यामुळे आजारांना निमंत्रण मिळत असल्याचा दावा करण्यात येत आहे. याविषयीचा एक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, ही माहिती खोटी असून RO च्या पाण्यामुळे कोणताही धोका नाही असं 'इंडिया टुडे'च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. (fact-check-ro-water-is-injurious-to-health-viral-video-social-media)

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये चार ग्लासमध्ये वेगवेगळे द्रवपदार्थ ठेवले आहेत. या पैकी तीन ग्लासांमध्ये विजेची तार सोडल्यावर बल्ब पेटला होता. तर RO चं पाणी असलेल्या ग्लासात विजेची तार सोडल्यावर बल्ब पेटला नाही. त्यावरुन RO चं पाणी शुद्ध नसल्याचा दावा या व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे. परंतु, इंडिया टुडेच्या एंटी फेक न्यूज वॉर रुममध्ये (AFWA) व्हायरल होत असलेल्या व्हिडीओची सत्यता पडताळली. त्यावेळी हा व्हिडीओ फेक असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. अतिशुद्ध पाण्यामध्ये वीज वाहून नेण्यासाठी लागणारी आवश्यक तत्वे नसतात. त्यामुळे व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे RO च्या पाण्यातून वीज प्रवाहित झाली नाही. परंतु, RO चं पाणी अत्यंत शुद्ध आणि सुरक्ष्त असून त्यात TDS लेव्हल ३०० मिलीग्रँम प्रतिलीटरपेक्षा कमी असतं. तर, अत्याधुनिक RO सिस्टीममधील अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी शरीराला आवश्यक असणारे मिनरल्स पुरवते.

Fact Check : RO चं पाणी पिणं ठरतंय शरीरासाठी घातक?
मुलींना १० व्या वर्षी का येते मासिक पाळी?

याविषयी दिल्ली विद्यापीठाच्या एआरएसडी कॉलेजमधील फिजिक्स विभागाचे असिस्टंट प्रोफेसर डॉ. अशोक यांनीदेखील याविषयी त्यांचं मत व्यक्त केलं. "RO चं पाणी शरीरासाठी अत्यंत सुरक्षित आहे. या पाण्यात TDS लेव्हल ३०० मिलीग्रँम असते आणि डब्ल्युएचओनेदेखील याला मान्यता दिली आहे", असं अशोक म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "अतिशुद्ध पाण्यात कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, सोडिअम आणि पोटॅशिअम नसतं. त्यामुळे त्या पाण्यातून वीज प्रवाहित होत नाही आणि परिणामी, बल्ब पेटत नाही. परंतु, मग हे पाणी उपयोगाचं नाही किंवा त्यात पोषक घटक नसल्यामुळे ते शुद्ध नाही असा त्याचा अर्थ होत नाही. ज्या पाण्यात किंवा अन्य द्रव पदार्थांमध्ये वरील पोषक घटक असतील त्यात विजेचा बल्ब लगेच पेटेल. परंतु, याचा अर्थ ते पदार्थ शुद्ध आहेत असा होत नाही."

काय आहे व्हिडीओमध्ये?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने टेबलावर चार ग्लास ठेवले आहेत. यात पहिल्या ग्लासात RO चं पाणी, दुसऱ्या ग्लासात साधं पाणी, तिसऱ्यात दूध आणि चौथ्यामध्ये दही ठेवलं आहे. हा व्यक्ती प्रत्येक ग्लासात विजेची एक तार टाकतो. विजेची तार तीन ग्लासांमध्ये टाकल्यावर तारेला जोडलेला ब्लब पेटतो. परंतु, RO च्या पाण्यात तार टाकल्यावर बल्ब पेटत नाही. त्यामुळे RO च्या पाण्यात मिनरल्स किंवा अन्य कोणतेही घटक नसल्यामुळे बल्ब पेटत नाही असा दावा या व्यक्तीने केला आहे. सोबतच पाण्यात कोणतेच पोषकघटक नसल्यामुळे RO चं पाणी आयोग्यासाठी घातक असल्याचंही त्याने म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com